शिवश्री,

 आपल्या वरील पत्रातील बरेच मुद्दे विसंगत वाटत आहेत. कृपया स्पष्टीकरण मिळेल का?

संभाजी ब्रिगेड आणि शिवराज्य पक्षाबद्दल मलाही सहानुभुती आहे

एका पुस्तकावर आक्षेप असणाऱ्या ह्या संघटनेने इतिहासाचा वारसा जपणाऱ्या अख्ख्या ग्रंथालयाची नासधूस केली आणी किरकोळ शिक्षा वगळता सर्व कार्यकर्ते सहीसलामत सुटले अश्या ह्या संघटनेबद्दल आपल्याला सहानूभुती कशी काय?

"हिंसाचारामुळे कोणतेच प्रश्न सुटत नसतात. सरदार भगतसिंगांनी जेव्हा संसदेत बाँब टाकलेत तेंव्हा हिंसा करणं हा त्यांचा हेतू नव्हताच,त्यांना फक्त झोपलेल्यांना जागं करायचं होतं." 

 हे आपलेच विचार आहेत ना?

सदर घटनाही (बहुलेकर मारहाण) आपल्याला वरील कारणानेच खटकते पण पुढे मात्र आपण 'प्रतिमा वाईट व्हायला नको' 'प्रसार माध्यमांना संधी नको; अशी कारणे का देत आहात? ह्याच अर्थ असा होतो की आपणास तत्वतः ह्या घटनेत काहीही चुकीचे दिसत नसून केवळ वरील कारणांमुळे आपल्या कार्यकर्त्यांनी थोडे सावध राहवे असे वाटते.

बहुजन समाजाने 'बामणाना ठेचा' असे म्हणणे आणी ब्राह्मणांनी 'दलित हे पायाखालीच ठेवले पाहिजेत' असे म्हणणे हे दोन्हीही विचार संपूर्ण समाजालाच खूप मागे नेत आहेत. दुर्दैवाने आपले लिखाण (निव्वळ हे पत्रच नव्हे आपले इतरत्र असणारेही लिखाण) आपण पाहिल्या गटात मोडता असा समज करून देतात. 

आपल्या समाजात पूर्वी दुही होती अजूनही थोड्याफार प्रमाणात आहे हे वादातीत आहे. ह्यावर उपाय हा समाजातील सर्व वर्गांनी सामंजस्य दाखवणे हा आहे. एकमेकाचे वाभाडेच काढायचे असतील तर मधल्यामध्ये देशाचे मात्र वाटोळे होईल.

मला माहीत आहे ,इथे माझ्या विचाराचे लोक नगण्य आहेत. एक अर्थानं मी आंधळ्यांच्या बाजारात आरसे विकत आहे,पण मला फक्त आमची बाजू लोकांपर्यंत न्यायची आहे.

आपल्या शिवधर्माबद्दल च्या लेखामध्ये मा.एकनाथ फडके यांनी आपणास खरोखर काही प्रामाणिक प्रश्न विचारले होते. त्या शंकांचे निरसन करून तुम्ही 'आंधळ्या' लोकांना दृष्टी देऊ शकला असतात पण तिथेही तुम्ही टाळाटाळ केलीत. आता निदान अशी तक्रार तरी करू नका.

वरुण.