ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर हा वाद महाराष्ट्राला नवा नाही. (येथे कुठल्याही जातिविशेषाचा उल्लेख नाही तर हे महाराष्ट्रात याच नावाने प्रसिद्ध झालेले वैचारिक गट आहेत) शंभराहून अधीककाळापासुन म्हणजे १८९७ च्या वेदोक्त प्रकरनापासनं हा वाद उभ्या महाराष्ट्राला पोळतोय.
दोन्ही बाजूने विद्वान लोक आपापली मते मांडताना दिसताहेत. पण दोघांच्याही आंधळ्या विरोधाशिवाय काहीही ठोस असे यातून निष्पन्न झाले नाही. नेमके असे करून या दोन्ही बाजूच्या विद्वानांना साधायचे तरी काय आहे यांचेच त्यांना उत्तर सापडत नाही. त्यामुळे जेव्हा ज्यांच्या हाती जे आणि जसं कोलीत सापडतं तसा वापर केला जातोय. (हे माझं मत) यातून महाराष्ट्राच्या आर्थिक , भौतिक वैभवात तर काहीच भर पडत नाही उलट आमच्या सांस्कृतिक वारशाचे तुकडे पाडून त्याची लक्तरे वेशीवर मांडण्याचा प्रकार जो दोन्ही बाजूने आपापल्या संस्कारांप्रमाणे - पद्धतीप्रमाणे होत असतो... त्याचा संपूर्ण निषेध!!!
मला शिवाजी आवडतात, संभाजी, पाहिले बाजीराव, माधवराव सुद्धा!! पाहिले बाजीराव शूर कसे हा प्रश्न सुद्धा माझ्या सामान्य मनाला पडत नाही. तसेच शिवाजींनी कर्तृत्वाने कमावलेल्या स्वराज्याच्या राज्याभिषेकाचा अधिकार त्यांना नाही असं तर अजिबातच पटत नाही. शाहू आवडतात तसेच टिळकही ...
वेदोक्तानंतर उडालेल्या भडक्यावर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण एका पुस्तकात म्हणतात " शाहू महाराज व लो. टिळक यांच्या कुंडल्या जुळल्या नाहीत हे महाराष्ट्राचं दुर्दैव !"
आणि हे खरंच आहे. शेवटी भोगावं महाराष्ट्रालाच लागतं !!! जीजाऊ आमच्या आई आणि ज्या रा. गो भांडारकरांच्या नावानं त्यांच्या विद्यार्थ्यांनी ती संस्था १९१७ ला सुरू केली ते भांडारकरसुध्दा आमचेच ना !
बहुलकर हे संस्कृतचे प्राध्यापक आणि त्यांच्या विद्वत्तेबद्दल मी ऐकून आहे. ( वर कुणी हे कोण म्हणून विचारले म्हणून हे दिलं आहे)
शिवश्री , आपण मांडता आहात त्यात एक मुद्दा पटतोय ... तो म्हणजे विरोध करण्याचा 'हा' मार्ग नक्कीच चुकीचा आहे. तो बदलायला हवा. आपण या संघटनांशी संबंधीत आहात आणि असा विचार करता आहात हे वाचून बरं वाटलं... असं काही घडू द्या तर बरं वाटेल.
दुसरा एक मुद्दा- प्रसार माध्यम मी काही बहुजनवादी म्हणवणारी मासिके वाचलीत तर त्यात एकाच जातिविशेषाची महती जाणवेल इतपत होती. त्यामुळे त्यांच्या वितरणाचा आकडा एका ठराविक मर्यादे पलीकडे जात नाही. देशोन्नती आणि सकाळ हे वृत्तपत्रे आपणास ज्ञात नाहीत का? हि वृत्तपत्रे कुठल्याही विचाराशी मूर्खपणे बांधिलकी दाखवताना दिसत नाहीत. मात्र आपणास अपेक्षीत 'तसं' लिखाण होत नाही हे खरं.
नीलकांत