{बहुलकरांना मारहाण करण्याआधी त्यांचा लेख तुम्ही वाचला असेल असे समजतो... त्या लेखावरची तुमची टिपणे आणि तो मूळ लेख इथे प्रकाशित करा.}

या लेखावर आणि सदर पुस्तकावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातली आहे याची माहीती असावी.

किती सोयिस्कर! लेखावर/पुस्तकावर बंदी आहे, त्यामुळे वाचू शकलो नाही, त्यामुळे टिपणे मांडता येत नाही. तेव्हा (मूळ लेख न वाचता, मूळ लेखात नेमके काय लिहिले आहे हे न पाहता, केवळ सांगीवांगीवर) मारहाण करणे, हाच एक पर्याय राहतो!

टीप: सलमान रश्दींच्या 'सॅटनिक व्हर्सेस'बद्दल असेच काहीसे झाल्याचे आठवते. ते पुस्तक बकवास आहे, आणि पैसे देऊन विकत घेण्याच्या लायकीचे नाही, हा भाग वेगळा. (इथे अमेरिकेत त्या पुस्तकावर बंदी नसल्याने माझ्या संग्रही आहे. हिंदुस्थानात आणि इतरत्र झालेल्या गदारोळामुळे कुतूहल चाळवल्याने विकत घेतले, आणि कंटाळा न येता जितके वाचू शकलो, त्यावरून या निष्कर्षाप्रत पोहोचलो, आणि उगीच पैसे वाया घालवले, असे वाटले. असो.)

किंबहुना, 'बहुजनसमाजा'च्याच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या 'रिडल्स इन हिंदुइझ्म'बद्दल 'अ-बहुजनसमाजा'च्या लोकांनी - बहुधा ते न वाचता अथवा त्यात लेखकाला काय म्हणायचे आहे यावर विचार न करता, आणि लेखकाच्या विचारस्वातंत्र्याची तर मुळीच कदर न करता - असाच हंगामा उठवला होता. याहीबाबत आपली मते कळली तर बरे होईल. 'बहुजनसमाजा'ने केलेल्या मारहाणीला आपण लावत आहात ती न्यायतत्त्वे तितक्याच समतेने 'अ-बहुजनसमाजा'ने केलेल्या गदारोळाला आपण लावू शकता/इच्छिता का, हे जाणण्यास उत्सुक आहे. (यामागे 'अ-बहुजनसमाजा'च्या प्रतिक्रियेचे समर्थन करण्याचा कोणताही उद्देश नाही. व्यक्तिशः 'रिडल्स'बद्दल 'अ-बहुजनसमाजा'ने केलेला गदारोळ हा अयोग्यच होता, असे माझे मत आहे. एखाद्याची मते कितीही अप्रिय असली, तरी ती मांडल्याबद्दल त्याला मारहाण, मोर्चे, दंगली, जाळपोळ हा मार्ग होऊ शकत नाही, असे मला तरी वाटते.)

माझ्या एका गझलेतील शेर-

हा कुण्या पोथीतला अध्याय नाही

स्वाभिमानाचीच अमुच्या बात आहे !

केशवकुमारांनी कोठेसे कोणालासे उद्देशून म्हटलेच आहे: 'दावू गाउनि आपुल्याच कविता आम्हीच रस्त्यामधे'... चालायचेच!

सांगण्याचा उद्देश: केवळ आपण कोठेतरी काहीतरी लिहिले आहे याने काहीही सिद्ध होत नाही. असो.

- टग्या.