शिवश्री,

आपल्या लिखाणामुळे मनोगतवरील वातावरण दूषित होत आहे हे आपल्या लक्षात येत नाही का? आपल्या लिखाणाचे विषय खूप जुने आणि चावून चोथा झालेले असतात. संभाजी ब्रिगेड ही काय लायकीची संघटना आहे हे सर्वांनाच माहिती आहे. काहीतरी विधायक आणि रचनात्मक काम करण्यापेक्षा मारहाण, दमदाटी, दादागिरी असल्या थिल्लर प्रकारात धन्यता मानणारी ही लोकं आहेत. पुरुषोत्तम खेडेकर हा माणूसही काय लायकीचा आहे ते सगळे जाणून आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि फायद्यासाठी असली प्रक्षोभक कृत्ये तो करत असतो हे तुमच्या लक्षात कसं येत नाही? आज उत्तर भारतीयांच्या लोंढ्याला कसं तोंड द्यायचं, त्यांची दिवसेंदिवस वाढत जाणारी मुजोरी कशी थांबवायची यावर विचार करण्याची वेळ आहे. त्यासाठी मराठी माणसांनी एकजूट दाखवून एकत्र यायचं की एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढत शिळ्या कढीला ऊत आणत बसायचा? इतिहास कधीच बदलता येत नसतो. असले प्रकार करून कुणाचा काय फायदा होणार आहे? उत्तर भारतीयांच्या मुजोरीचे इतके प्रकार मुंबई-पुण्यात घडतात, त्यासाठी संभाजी ब्रिगेड काय करतं? पुण्यासारख्या ठिकाणी मराठी माणसाची, मराठी भाषेची गळचेपी होत आहे, त्यादृष्टीने संभाजी ब्रिगेड्ने काय केले? याला धरून हाण आणि त्याला धरून बदड आणि तेही फक्त मराठी माणसाला, अमहाराष्ट्रीय तोही युपी, बिहारी असेल तर संभाजी ब्रिगेड शेपूट घालून पसार! संभाजी ब्रिगेडच्या किती सभासदांना शिवाजीमहाराज पूर्ण माहित आहेत?

स्वातंत्र्य मिळून ५८ वर्षे झाली. दुनिया पार बदलून गेली. पण अजूनही ब्राह्मणांना शिव्या देण्याचे, त्यांच्यावर आगपाखड करण्याचे प्रकार कमी झालेले नाहीत. याला कारण म्हणजे राजकारण. यातून निष्पन्न काय होणार आहे? वास्तविक ब्राह्मण ही शांतताप्रिय आणि जबाबदार जात आहे. आपल्याकडून कुणाला त्रास होणार नाही याची ते सतत खबरदारी घेत असतात. नाकाच्या सरळ रेषेत चालाणारी ही जात आहे. तसे पाहता आता असल्या शिव्याशापांकडे लक्षही कुणी देत नाही. काळवेळेनुसार बदलणे खूप आवश्यक असते. आपण जर तेच दळण युगानुयुगे दळत बसलो तर आपली अधोगती निश्चित आहे! वेळीच सावरणे गरजेचे आहे.

--समीर.