सगळा कबिला घेऊन लढायांवर गेले असते तर, राज्याचं पानिपत शहाजीराजांच्या काळातच झालं असतं असं नाही का वाटत आपल्याला? वैयक्तिक सुखापेक्षा कर्तव्यपूर्ती किती महत्वाची होती, असा निष्कर्ष का निघत नाही? शिवाय, शिवराय आणि जिजाऊ पुण्यात राहीले नसते तर स्वराज्यस्थापनेचे स्वप्न(ते जितके जिजाऊ यांचे होते तितकेच किंवा त्याहून अधिक शहाजीराजांचेही स्वप्न होते असेच इतिहास आणि शहाजीराजांचे कर्तृत्व सांगते) इतक्या यशस्वीरीत्या साकार करण्यास असंख्य अडचणी आल्या असत्या. मला तर वाटतं की दूर राहण्यात जे फायदे होते ते सर्व फायदे जिजाऊ जर शहाजीराजांसोबत बंगळूरात असत्या तर मिळाले नसते. दूर राहाणे हा शहाजी आणि जिजाऊ यांचा मराठी राज्याच्या भविष्याचा विचार करून घेतलेला सावध निर्णय ("concious decision" असं मला म्हणायचं आहे) होता असं मला वाटतं.