कुमार, भातुकलीच्या त्या एका कडव्यामुळे या संपूर्ण कवितेला एक रंग देता येतो.  कवितेतली नायिका आपल्या आजोळी आलीय आणि आजोळी घालवलेले दिवस जणू पुन्हा तिच्या समोर उभे राहताहेत हे आपण या भातुकलीतून घेऊ शकतो.  आता तो लहानपणीचा सखा असावा जो या चित्रातला खरा रंग आहे. 

एक भातुकली शब्दामुळे कवितेत लहानपणीच्या आठवणींच्या छटा आहेत हे मान्य केले तर चित्र अधिकच खुलून येईल.  त्या पेरूची त्या डाळिंबाची चव आतासुद्धा या चित्रात अनुभवता येईल.

आता बघा पुन्हा वाचून...

सौमित्र