शिक्षकजी,

(१) तुमच्याशी सहमत.

"सा अपि अन्यम् इच्छन्ति जनं स जनोऽन्यसक्तः । अस्मद्कृते तु परितुष्यते काचिद् अन्या,"

याऐवजी संधी जुळवून व किंचित् फेरफार करून

"साप्यन्यमिच्छति जनं स जनो (अवग्रह {कसा लिहायचा?}) न्यसक्तः ।

 अस्मद्कृते तु परितुष्यति काचिदन्या"

असे केले तर वृतात बसते व क्रियापद वचनाशी जुळते असे वाटते.

(बाकी व्याकरण सुधारायला मी तुमचा आधार धरून चालतो आहे.)

शेवटची ओळ ही सर्वाना सुपरिचित आहे (किंबहुना फक्त तीच लक्षात राहिलेली आहे). ती  अशी आहे -

"धिक् तां च तं च मदनं च इमां च मां च"

(२) नीलेशने दिलेल्या अर्थाच्या शेवटी "त्याचा" याऐवजी "माझाही" (मां च) धिक्कार असो असे असले पाहिजे असे वाटते.

दिगम्भा