तुम्ही तुमच्या एका प्रतिसादात घटनेचा उल्लेख करता आहात, अहो घटनेतील विधेयकाबद्दलच आमचा राग आहे हे विसरलात का?

विधेयक? भारत एखाद्या विधेयकाने (बिल) धर्मनिरपेक्ष बनला नसून ही संकल्पना स्वतंत्र भारताच्या संकल्पनेतच निहित असून संविधानात आहे. आपला संविधानावरच राग असेल तर पुढच्या वाक्यात (या देशात राहणार असाल तर.. वगैरे वगैरे...) आपल्याला नक्की कोणता देश अपेक्षित आहे हे कळले नाही. भारतीय नागरिकांना कायदा तर पाळावाच पण भारताच्या संविधानाचा ही मान राखावा ही माफक अपेक्षा आहे.

अवांतर - विधेयक संमत झाल्यावर/झाले तर कायदा बनतो. पण तो म्हणजे संविधान नव्हे. संविधानाच्या या काही मुलभूत तत्वांत बदल करण्याचा आधार संसदेलाही नाही असे वाटते. चूभूद्याघ्या.