त्याने खूपच छान लेखमाला सुरू केलेली दिसते. अभिनंदन!
प्रस्तुत लेखात मांडलेले मुद्दे बव्हंशी खरे आहेतच परंतू त्यास अनेक सन्माननीय अपवाद देखिल आहेत. त्यापैकी एक दुसऱ्या विक्रमादित्याचा (सम्राट होण्या अगोदरचे त्याचे नाव आता आठवत नाही). मौर्यांचे साम्राज्य अशोकाच्या बौद्ध अगतिकते नंतर शक्तिहीन, दिशाहीन बनले होते. त्याचा परकीयांना चंद्रगुप्तासारखा धाक राहिलेला नव्हता, सीमा आकुंचन पावू लागल्या होत्या, प्रजा सुखी नव्हती. अशा राज्याला बुडवून दुसऱ्या विक्रमादित्याने प्रजादक्ष नवसाम्राज्याची निर्मिती केली. असे आणखी काही अपवाद आपल्या इतिहासात आहेत, अर्थात अभावाने!