मुद्दा क्र. ३ :

साहजिकच तसा नैतिक अधिकार असल्यासारखे बोलणाऱ्यांना दुसरी बाजू बघायला फ़ारसे आवडत नाही.

तुमचे निरिक्षण योग्यच आहे! आपण इतिहासात रमतो. पण इतिहासातल्या काही मोजक्याच घटनांवर आपण अस्मितेचे इमले बांधतो. पण त्याच वेळेस आपण हे विसरतो की आपण इतिहासाला सोयीस्कर वळण दिलेले आहे. इतिहासाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन आपण केलेले नाही. असे होतच रहाणार. त्याला इलाज नाही.

मुद्दा क्र. ४ :

पुढची पिढी वाया गेली असे मत प्रत्येक पिढीचेच असते. मी महाविद्यालयात जायला लागलो तेंव्हा आमच्या मामांनी मला "तुमानी घालून शेपटांच्या मागे हिंडतोयेस हे कळले तर थोबाड फोडीन" असा दम भरलेला अजुनही आठवतोय. पुढील पिढीच्या नैतिक वर्तनाची चिंता आणि जबाबदारी आधीच्या पिढीने स्वतःहून उचललेली असते, हे त्यामागचे कारण असावे.

हेच नव्हे तर सामाजिक जाणीवेच्या नावानेही आमच्या पिढीला तरुणांच्या नावाने बोटे मोडण्याचा फारसा अधिकार नाही. उलट आजाकालची वीशी पंचवीशीतली मुले समाजाचा स्वतःहून विचार करायला लागले आहेत असे दिसते. चूक की बरोबर हे गौण आहे, पण ज्या समाजात आपण रहातो त्याविषयी विचार करण्याचे समज आली आहे, हे काय कमी आहे?