अमेरिकेत रहाणारे हिंदूः जर त्यांनी आपल्याकरता एक वेगळा देश अमेरिकेतून केला आणि उर्वरित देशात धर्माधिष्टित कायदे बनवायचा हट्ट केला. हिंदूंच्या काशीयात्रेला सरकारने भरघोस मदत द्यावी असा कायदा करुन घेतला आणि अशाच मागण्या कायम वाढवत ठेवल्या तर अन्य अमेरिकन लोक नक्की म्हणतील की आपल्या देशात चालते व्हा. आणि त्यात गैर काय?
पण अमेरिकेतील हिंदू बिनबोभाट स्थानिक कायदे पाळतात. आपले स्वातंत्र्य कायद्याच्या कक्षेत राहून उपभोगतात. निषेधही योग्य त्या पद्धतीने करतात. हिंदू धार्मिक नेते अमेरिकेत हिंदूंचे राजकीय नेते नाहीत वगैरे वगैरे.
तेव्हा ही तुलना साफ गैरलागू आहे.
पाकचे दोन तुकडे "आपण" केले हे आपल्याला फार व्यथित करत आहे असे दिसते. भौगोलिक, प्रादेशिक, सांस्कृतिक फरकामुळे ते देश वेगळे झाले. आपण त्याचा फायदा घेतला हे खरे पण राजकारणात हे चालते. आणि आपण तिथली जमीन घशात घातली नाही.
काश्मीरचा एक लचका पाकने तोडला आहे आणि त्याला आझाद कश्मीर म्हणवतात हे आपणास उचित कृत्य वाटत असेल अशी खात्री आहे.
केवळ पन्नास वर्षापूर्वी झाले म्हणून विसरा ही आपली भूमिका मला पटत नाही. इतिहास विसरल्यामुळे तो पुन्हा घडण्याचा धोका असतो.
मुस्लिमांकरता वेगळा देश बनवला असताना उर्वरित देशात मुस्लिम धर्माला लाडावण्याचे काय कारण आहे?
तोंडी तलाक, अनेक बायका, कुटुंबनियोजनापासून दूर ठेवणे वगैरे कायदे का बनवले गेले? किती लोक ह्या "सवलती" उपभोगतात ते वेगळे पण कायदा वेगळा असणे हे चूकच.
अशाने "जा की पाकिस्तानात" छापाच्या भावना दिसून येतात. पाकिस्तान हा "कुठलातरी दुसरा" देश नसून भारतातील मुस्लिमांनी भांडून, हिंदूंचे रक्त सांडून इस्लामकरता एक देश बनवला आहे. हा इतिहास आपल्याला भले विसरावासा वाटत असेल. पण लोक तो इतक्यात विसरणार नाहीत. विशेषतः हा देश काय लायकीचा शेजारी बनून राहिला आहे ते पहाता.