आज आपले (हिंदू) लोक जगभर आहेत व आपली संस्कृती जपत आहेत. आपण अभिमानाने सकाळ मध्ये कॅलिफोर्नियात गणेशोत्सव साजरा झाल्याचे वाचतो. दुसऱ्या देशांनीही आपण म्हणता त्याप्रमाणे हिंदूंना भारतात परत जा सांगितलेले आपणास रुचेल काय?

या मागे आपले 'परदेशातले हिंदू आणि भारतातले *एका विशिष्ट धर्माचे लोक* यांची मानसिकता एकच आहे' असे गृहीतक आहे असे दिसते.

पर्यायाने आपले गृहीतक असमर्पक आणि गैरलागू आहे असे वाटते, म्हणून आपली तुलना गैरलागू आहे असे वाटते.

दुसऱ्या देशांनीही आपण म्हणता त्याप्रमाणे हिंदूंना भारतात परत जा सांगितलेले आपणास रुचेल काय?

अशी वेळ फक्त इदी अमीन(युगांडा, १९७१) आणि खोमेनी (इराण, १९७९) यांनी आणल्याचे आठवते. जेंव्हा हे झाले तेंव्हा ही राष्ट्रे लोकशाही प्रकारची होती असे वाटत नाही. तसेच त्यांनी परदेशी लोकांना हाकलले, एखाद्या विशिष्ट धर्माला नाही, असे वाटते.