आज आपले (हिंदू) लोक जगभर आहेत व आपली संस्कृती जपत आहेत. आपण अभिमानाने सकाळ मध्ये कॅलिफोर्नियात गणेशोत्सव साजरा झाल्याचे वाचतो. दुसऱ्या देशांनीही आपण म्हणता त्याप्रमाणे हिंदूंना भारतात परत जा सांगितलेले आपणास रुचेल काय?
या मागे आपले 'परदेशातले हिंदू आणि भारतातले *एका विशिष्ट धर्माचे लोक* यांची मानसिकता एकच आहे' असे गृहीतक आहे असे दिसते.
- जसे भारतातले *एका विशिष्ट धर्माचे लोक* कायदे आणि नियम आपल्या धर्माच्या १३०० वर्षे जुन्या पुस्तकाप्रमाणे असावेत असा हट्ट धरतात, तसे परदेशातले हिंदू लोक वेद किंवा मनुस्मृती(जे १३०० वर्षांपेक्षा जास्ती जुने आहेत असे वाटते.) पाळण्याचा हट्ट धरत नाहीत असे वाटते. (भारतातलेही हिंदू असा हट्ट धरत असतील असे वाटत नाही.)
- तसेच हिंदू आपली संस्कृती आणि धर्म जपतजपत मुख्य प्रवाहात सामील होताना दिसतात.
- स्वतःच्याच वेदपाठशाळा काढून फक्त संस्कृतमच्ये शिक्षण देऊन व्यावहारिक आणि आधुनिक शिक्षणापासून आपल्या नवीन पिढ्यांना रोजगारापासून दूर ठेवताना दिसत नाहीत.
- अल्पसंख्याक म्हणून विशेष सवलती आणि सोयी मागताना दिसत नाहीत असे वाटते.
- हिंदू देवतांचे विडंबन झाले म्हणून दंगली घडवून आणत नाहीत असे वाटते.
- त्या त्या देशाची घटना-कायदे यांच्यापेक्षा आपल्या धार्मिक नेत्यांचे फतवे श्रेष्ठ आहेत असे म्हणत नाहीत असे वाटते.
- ते त्यांच्या राजकीय निष्ठा देशाबाहेरच्या धार्मिक ठिकाणांशी संलग्न ठेवत नाहीत असे वाटते.
- म्हणूनच असे वाटते की, डॉ. देशमुख इराकमधल्या लढाईत अमेरिकेकडून धाडले जातात आणि ते जातातही.
पर्यायाने आपले गृहीतक असमर्पक आणि गैरलागू आहे असे वाटते, म्हणून आपली तुलना गैरलागू आहे असे वाटते.
दुसऱ्या देशांनीही आपण म्हणता त्याप्रमाणे हिंदूंना भारतात परत जा सांगितलेले आपणास रुचेल काय?
अशी वेळ फक्त इदी अमीन(युगांडा, १९७१) आणि खोमेनी (इराण, १९७९) यांनी आणल्याचे आठवते. जेंव्हा हे झाले तेंव्हा ही राष्ट्रे लोकशाही प्रकारची होती असे वाटत नाही. तसेच त्यांनी परदेशी लोकांना हाकलले, एखाद्या विशिष्ट धर्माला नाही, असे वाटते.