भारतातले मुस्लिम व अमेरिकेतील हिंदू (धर्म बदलाने झालेले की भारतातून गेलेले? भारतातून गेलेले म्हणाल तर किती पिढ्या आधी अमेरिकेत गेलेले?) यांची तुलना (जी आपण केली आहे) ती गैरलागू आहे.
पण याच उलट मनकवडा यांची तुलना जास्त उजवी आहे. भारताला भारतातील मुस्लीम (जे अनेक पिढ्या इथलेच आहेत, बांगलादेशी मुस्लीम नव्हे!) हे अमेरिकी लोकांना अमेरिकेतील (इथून तिथे गेलेले!) हिंदू जितके प्रिय आहेत, त्याहून अधिक प्रिय असणे अपेक्षित नाही का? बर नसलेच तर किमान तितकी सहनशीलता आपण दाखवता कामा नये का? (याचा अर्थ सहनशीलतेचा अतिरेक करावा असा नाही, ज्याला त्याला स्वतःच्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचे स्वातंत्र असावे, जे घटनेने मान्य केले आहे.)
मुस्लिमांकरता वेगळा देश बनवला असताना उर्वरित देशात मुस्लिम धर्माला लाडावण्याचे काय कारण आहे?
लाडावण्याचे नाही मात्र समान अधिकार, प्रतिष्ठा, स्थान देण्याचे मात्र नक्कीच कारण आहे. ते हे की भारत धर्माधिष्ठीत नाही.
तोंडी तलाक, अनेक बायका, कुटुंबनियोजनापासून दूर ठेवणे वगैरे कायदे का बनवले गेले?
या वैयक्तिक वा धार्मिक बाबी आहेत. यात (शक्यतो) शासनाने ढवळाढवळ करणे अपेक्षित नाही. (मानवी हक्क नाकारले जात असताना दखल घेणे, योग्य ती कारवाई करणे मात्र जरूरीचे आहे.) समान नागरी हक्क यावेत या साठी त्या समाजाच्या शिक्षणासाठी अधिक कृतीशील व्हावे व आधुनिकतावादी विचारसरणी दडपली जाणार नाही याची काळजी शासनकर्त्यांनी घ्यावी असे वाटते. पण इतके धाडस सध्याचे राज्यकर्ते दाखवतील असे वाटत नाही.
पाकिस्तान हा "कुठलातरी दुसरा" देश नसून भारतातील मुस्लिमांनी भांडून, हिंदूंचे रक्त सांडून इस्लामकरता एक देश बनवला आहे.
भारतातील? म्हणजे स्वतंत्र्यापूर्वीच्या की नंतरच्या? 'रक्त फक्त हिंदूचेच सांडले गेले' हे आपले गृहीतक उद्बोधक आहे.