१. हे खरे असेल तर अशी आरोळी देणाऱ्यांना कठोर शासन होणे गरजेचे आहे. अर्थात हे करण्यास नालायक सरकार देण्याचे काम आपन चोख बजावले आहेच.

२. हा प्रश्न निव्वळ धार्मिक नसावा. नेत्यांची जात/धर्म एकच आहे असे वाटते. धार्मिक भावना भडकावून त्यावर आपली पोळी भाजून घेणे, भारतात शक्य ही आहे, नि विधायक कामे करण्यापेक्षा स्वस्त ही.

३. आपल्याच भूमीवर? (बांगलादेश (सध्याचा) आपल्या भूमीवर आहे असे तो मानत नाही. होता हा इतिहास ठीक आहे.) तरीही कुठेही (विशेषतः शेजारी देशांत व ज्याशी आपले सांस्कृतिक संबंध आहेत) तेथील मानवी हक्कांची पायमल्ली नक्कीच निषेधार्ह व सुरेक्षेच्या दृष्टीने सजग राहण्याची गरज निर्माण करणारी आहे. (यात छळले जाणारे हिंदू आहेत की नाहीत ही बाब गौण आहे.) 'एथनिक क्लिंन्सिंग' कुठेही व कुणाचेही झाले तरी निषेधार्ह आहे. भारताच्या नजिकच्या इतिहासावरून बोध घेत हे भारतातच घडू नये हीच प्रार्थना.

भारतात हिंदूंनीच नव्हे तर सर्व जातीच्या हिंदूंनीगैरहिंदूंनी सारख्याच मानाने जगावे असे त्याला वाटते. दुसऱ्याला कमी लेखून आपण श्रेष्ठ ठरतो, दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर मर्यादा घातल्यास आपण मुक्त ठरतो असे त्याला वाटत नाही.

'ज्या भागात हिंदूंचा सफाया झाला आहे' वर प्रतिक्रिया देण्यासाठी सफाया म्हणजे नक्की काय? शिरकाण की स्थलांतर? कधी? कुठे? ही माहिती अपेक्षित आहे.

'हिंदूचे शिरकाण इतर धर्मियांच्या तश्याच शिरकाणापेक्षा कमी महत्वाचे आहे/दुर्लक्षण्याजोगे वा स्वीकारार्ह/स्तुत्य आहे' असा युक्तिवाद त्याने केल्याचे स्मरत नाही.

'किमान भारतात (सारे) हिंदू मानाने का जगू शकत नाहीत' याचे आत्मपरीक्षण हिंदूनीच करणे अपेक्षित आहे.

मताबद्दल ची लोकशाहीबद्दलची वा 'वोट बँक' चर्चा वाचताना आकड्यांच्या या खेळात बहुसंख्य, (शिवाय तुलनेने सधन, सुशिक्षीत) हिंदूंना अल्पसंख्यांक कशी मात देऊ शकतात याचे राहून राहून आश्चर्य वाटते.