त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व प्रतिप्रश्न...
१. हे खरे असेल तर अशी आरोळी देणाऱ्यांना कठोर शासन होणे गरजेचे आहे.
--- कोण करणार? मुस्लिमांना वोट बँक म्हणून वापरणारे सरकार? (याचा तपशिलवार सोदाहरण खल शेवटच्या मुद्द्यात केला आहे).
२. हा प्रश्न निव्वळ धार्मिक नसावा. नेत्यांची जात/धर्म एकच आहे असे वाटते. धार्मिक भावना भडकावून त्यावर आपली पोळी भाजून घेणे, भारतात शक्य ही आहे, नि विधायक कामे करण्यापेक्षा स्वस्त ही.
--- हो ना, जसे मुस्लिम आमदार/खासदार रस्त्यांऐवजी मशिदी बांधण्यावर भर देतात तसेच भाजपावाले मंदिरे बंधण्यावर!भाजपवाल्यांनी चौपदरी माहार्गावर सगळी मंदिरेच उभारली आणि आयोध्येचे मंदिर तर सत्तेत आल्या-आल्या पहिल्या महिन्यातच पूर्ण केले!!
'एथनिक क्लिंन्सिंग' कुठेही व कुणाचेही झाले तरी निषेधार्ह आहे. भारताच्या नजिकच्या इतिहासावरून बोध घेत हे भारतातच घडू नये हीच प्रार्थना.
--- प्रार्थने व्यतिरिक्त आपण कधी काय करतो? उखाद वेळी केलेच तरी आम्हीच आमच्यावर बोटे चेपत बसतो. गुजरात बद्दल आम्हाला आमचीच लाज वाटते. पण १७ वर्षांपासून काश्मिरात दररोज हत्याकांडे चालली आहेत त्याचे मात्र आम्हाला काहीही वाटत नाही. का वाटणार? सेक्युलर ना आम्ही, आणि मरणारे हिंदू!!
'ज्या भागात हिंदूंचा सफाया झाला आहे' वर प्रतिक्रिया देण्यासाठी सफाया म्हणजे नक्की काय? शिरकाण की स्थलांतर?
--- दोन्ही. अर्थात मी उत्तर द्यावेच असा हा प्रश्न नव्हे. कारण उत्तर तुम्हाला सुद्धा माहित आहे.
कधी? कुठे?
-- काय झ्याक काँग्रेसी प्रश्न विचारत राव! उत्तर दिले आहेच. तपशिलवार अकडेवारी अनेक "अधिकृत" संकेत स्थळांवर मिळेल. मला सापडलेल्यातले काही खाली देत आहे.
बंगालचा इतिहास
काश्मिरी हिंदूंच्या निःपाताची माहिती येथे मिळेल
पुर्वांचलातील हिंदूंच्या पतनाची एक सचित्र दुवा माझ्यकडे होता. सापडल्यावर पाठवतो.
'हिंदूचे शिरकाण इतर धर्मियांच्या तश्याच शिरकाणापेक्षा कमी महत्वाचे आहे/दुर्लक्षण्याजोगे वा स्वीकारार्ह/स्तुत्य आहे' असा युक्तिवाद त्याने केल्याचे स्मरत नाही.
-- जशी हिंदूंची इथनिक क्लिन्सिंग झाली व होत आहे तशी हिंदूंनी कधीच व कोणाचीच केली नाही. एक तरी उदाहरण देऊ शकत असाल तर बोला?? अहो, एका चिडलेल्या हिंदूने तेही नशेत "मुसलमानांना शरियत कायदा भारतात हवा असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावे" असे म्हटले तर ऐकणारा हिंदू (म्हणजे तुम्ही) इथे त्याची आरडाओरड करत आहात. किती मुसलमान/ख्रिश्चन हिंदूंच्या न्याय हक्कांसाठी असा आवाज उठवतात? आणि ते उठवत नाहीत म्हणून तेथे हिंदूचा "सफाया" होतो आणि तुमच्या-आमच्या सारखे सहिष्णु हिंदू असल्यामुळे हिंदू कधिच कोणाचा "सफाया" करू शकत नाही.
'किमान भारतात (सारे) हिंदू मानाने का जगू शकत नाहीत' याचे आत्मपरीक्षण हिंदूनीच करणे अपेक्षित आहे.
जगात कुठेही मणुष्य "पूर्ण सुखी" नाही. त्यावर "सारे" सुखी नाहीत म्हणून आपण आपले कमरेचे सुद्धा सोडून द्यावे असे म्हणने शुद्ध मुर्खपणा ठरेल. मुळात हा चर्चेचा वेगळा विषय होऊ शकतो. हिंदूंमधील गैर चालिरिती हिंदू झपाट्याने सोडून देत आहे. त्याचे उदाहरणच द्यायचे झाले तर महाराष्ट्रातील संत परंपरा, राष्ट्रपुरूषे पहा. सावरकर, आगरकर, आंबेडकर, फुले, गांधी, राजराम मोहनरॉय यांच्या सारखे मुस्लीम समाजसुधारक किती झाले? उलट त्यांनी १३०० वर्षे जुनाट शरियतला कायदा मानून जगण्यासाठी तुमचे घर (तुमचा देशच) वाटून घेतला!
मताबद्दल ची लोकशाहीबद्दलची वा 'वोट बँक' चर्चा वाचताना आकड्यांच्या या खेळात बहुसंख्य, (शिवाय तुलनेने सधन, सुशिक्षीत) हिंदूंना अल्पसंख्यांक कशी मात देऊ शकतात याचे राहून राहून आश्चर्य वाटते.
--- कमाल आहे? तुम्ही भारतातच राहता ना? वर्तमानपत्रे वाचत नाही का? एक गठ्ठा १५ ते २० टक्के मते मुस्लिमांशिवाय कोणता समाजघटक देऊ शकतो? जिथे मतदानाची सरासरी ५०% आहे त्यात ही १५-२०% निर्णायक का नाही ठरू शकत? उरलेले ३०-३५% दोन-तीन उमेद्वारांमध्ये विखुरले गेले तर जिंकणार कोण? ज्याला "ते गठ्ठा" मतदान झाले तो!!
उदा. आपले मा. देशमुख साहेब मागच्या वेळी निवडणुकीत पडले. का? त्यांच्या विरोधकाने (शिवाजीराव कव्हेकर) असा प्रचार केला की विलासराव फक्त मराठा धार्जिने आहेत. मीच काय तो मामुली (मारवाडी, मुस्लीम, लिंगायत) यांच्या कैवारी! झाले, मुस्लीमांचा १५% गठ्ठा + मारवाड्यांचा गठ्ठा ५% + लिंगायत गठ्ठा ३०% आणि विलासराव पराभूत!!! नंतर कव्हेकर साहेबांचे "मामुली" राजकारण देशमुख साहेबांनी त्यांच्या गळ्यात घातले हा भाग निराळा.
होईल अता विलासरावांची हिंमत मुसलमानांच्या "कोणत्याही" अपेक्षा नाकारण्याची?
तर असे आहे हे. जरा समजून घ्या साहेब, हे गणित फार महत्वाचे आहे. इथेच सगळी गोची आहे!