४. दंगली मूर्खपणाच्या होत्या.
त्यांचा भारतातल्या *विशिष्ट धर्मीयाकडून* निषेध झाला का? सदर व्यंगचित्रकाराची हत्या करणाऱ्याला इनाम भारतातूनसुद्धा जाहीर झालाच ना!
शिवाय हे गैरलागू आहे. भारतात 'दंगली' झाल्याचे त्याला कळले नाही.
हैदराबाद!?
६. राजकीय निष्ठा व धार्मिक निष्ठा यांची गल्लत होता कामा नये.
सहमत.
इतकी सुजाणता भारतीयांमध्ये नाही हीच तर खंत आहे.
हेच तर मूळ आहे कारण अनेकजण स्वतःला भारतीय समजतच नाही. कारण 'दे आर अनअवेअर ऑफ सेपरेशन ऑफ स्टेट अँड रिलिजन!'
राजकारण/राजसत्ता आणि धर्म एकमेकांपासून वेगवेगळे आहेत अश्या अर्थाचे *पुस्तकात* काही लिहिले नसल्याने ते दोन्ही एकच आहेत अश्या समजातून राजकीय निष्ठा देशाबाहेर आणि/किंवा धार्मिक नेत्यांबरोबर ठेवल्या जात आहेत असे वाटते.
स्वतंत्र भारतात, आंतरराष्ट्रीय धोरणाबद्दल शंकराचार्यांनी पंतप्रधानांना बजावल्याचे माझ्या स्मरणात नाही. किंवा शंकराचार्यांच्या कोणत्या राजकीय भाषणाने जनतेने एखाद्या विशिष्ट पक्षाला आणि/अथवा नेत्याला भरघोस मते टाकल्याचेही आठवत नाही.
एखाद्या राजकीय पक्षाने आणि/अथवा नेत्याने धर्माची हाक देऊन मते जमवण्याला सुजाण हिंदू कोतेपणा समजतो असे वाटते. हेच *एका विशिष्ट धर्माबाबत* म्हणता येईल असे वाटत नाही.
धार्मिक निष्ठा भारता बाहेर असून देखील राजकीय निष्ठा भारताशी असणे अत्यावश्यक आहे.
हेच भारतातल्या *एका विशिष्ट धर्माच्या* बहुसंख्य लोकांना समजत नाही असे दिसते.
धार्मिक निष्ठा भारतातच असावी ही अट मात्र अनावश्यक वाटते.
सहमत.
७. याबद्दल पुन्हा केंव्हातरी. स्वामीनारायण अय्यर अशाच विषयावर यांनी एक सुरेख लेख लिहिला होता.
वाट पाहत आहे.
इदी/खोमोनी यांची परिस्थिती वेगळी होती असे वाटते.
जगाच्या इतिहासात एखाद्या स्वतंत्र राष्ट्रातून घाऊक आणि सरसकटपणे हिंदू हाकलले जाण्याच्या या दोनच नोंदी आढळतात. (इराणमधल्या यजमान धर्माकडून परधर्मद्वेष येण्यात काही नावीन्य आहे असे मला वाटत नाही आणि इदी अमीन काय धर्माचा होता ते माहीत नाही.) आणि त्यांची परिस्थिती वेगळी होती हेच मला म्हणायचे आहे. आपल्या वरील वाक्याने सदर मुद्दा पुन्हा सिद्ध करण्यास मदत मिळते असे वाटते.
ही दोन उदाहरणे वगळता एखाद्या स्वतंत्र राष्ट्रातून घाऊक आणि सरसकटपणे हिंदू कधीच हाकलले गेले नाहीत असेच मला म्हणायचे आहे. हिंदूंबद्दल एखाद्या राष्ट्रात असा द्वेष का उफाळला नाही त्याची काही कारणे माझ्या वरील प्रतिसादात आहेत असे वाटते.
पण जगाच्या इतिहासात एखाद्या स्वतंत्र राष्ट्रातून घाऊक आणि सरसकटपणे ज्यू आणि मुसलमानांना हाकलून देण्याच्या नोंदी यापेक्षा अधिक आहेत असे वाटते.