आपल्या देशातील लोक इंग्रजांच्या मानाने असत्यनिष्ठ व बेकरारी आहेत, हे विधान वाचून पुष्कळांस राग येईल. अलीकडे, अनेक वक्त्यांचा व लेखकांचा आपल्या जुन्या ग्रंथातून आपल्या नीतिमत्तेबद्दलचे दाखले काढून, आपण हल्ली तितकेच नीतिमान आहोत, असे अप्रत्यक्षतः सिद्ध करण्याचा प्रघात पडला आहे. परंतु हा प्रकार सर्वथा आत्मघातकीपणाचा आहे, असे आम्हास स्पष्ट म्हटले पाहिजे. आपले पूर्वज एकदा अत्यंत नीतिमान व सत्यनिष्ठ असल्याबद्दल भारतादी ग्रंथ साक्ष देत आहेत, व त्याबद्दल मतभेद होण्याचा मुळीच संभव नाही. यास मुख्य प्रमाण हेच की, आपला देश एकदा फार भरभराटीस आला होता. परंतु तीच नीतिमत्ता व सत्यनिष्ठा त्यांच्या सांप्रत वंशजात आहे असे म्हणणे, म्हणजे गेल्या हजार वर्षांच्या गुलामगिरीचा व दारिद्र्याचा आपणावर काही परिणाम झाला नाही असे म्हणण्यासारखेच आहे. लॉर्ड कर्झनसारख्याने सबंध देशास असत्यनिष्ठ म्हटल्यास आपणास त्वेष येणे हे ठीक आहे. परंतु आत्मनिरीक्षणप्रसंगी आपणास खरा प्रकार लपविता कामा नये.
हे वाचून खालील चर्चा आठवली...