कोल्हटकरांच्या या लेखाच्या निमित्ताने नव्वदीतल्या एका गृहस्थांशी चर्चा झाली.

स्पष्टवक्‍ते असा मोघम संदर्भ देऊन विचार मांडतील असे वाटले नव्हते :)

इंग्रजी भाषा व त्यातून मिळणाऱ्या ज्ञानाच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली काही मूर्ख माणसे त्या काळी होती. कोल्हटकर हे त्यातलेच एक.

याच 'मुर्खा'ला त्या काळी १९२७ च्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनवले होते. चालायचेच.

त्यांच्या बडबडीकडे त्या काळीही फारसे कोणी लक्ष दिले नाही.

सहाजिकच आहे. नाही का? या सद्-गृहस्थांनी तर नक्कीच दिले नसेल! लिहायचेच ते तसं काही-बाही.

इंग्रजांचे सरकार होते त्यामुळे प्रभावित होऊन आणि घाबरूनही लेखन केले जात असे.

नाहीतर काय! चुकुन एखादे महाराष्ट्र गीत (बहु असोत सुंदर..की काय ते) लिहीले म्हणून काय झाले? इंग्रजांचे लांगुलचालन नुसते!