हा नवीन पक्ष सुशिक्षितांच्या चर्चेत येत आहे हे खरे आहे. अगदी काँग्रेस शतकापूर्वी चर्चेत होती तसे. म्हणजे ज्यांना अद्ययावत माहिती प्रणाली आहे त्यांना... अजून यांना बरेच चालावे लागेल जेणेकरून त्यांना "considarable mass" पर्यंत पोहोचता येईल. सध्या तरी त्यांच्याबद्दल भरपूर अशी माहिती नाही. माझा एक जोधपुरी मित्र जो की आयआयटी वाला आहे त्याच्याशी चर्चा करताना असे कळले की या पाच जणांपैकी एक महाविद्यालयात असताना पासूनच पक्ष स्थापणेच्या व राजकीय सामाजिक बदलाच्या विचारांचा आग्रही होता.
या पक्षाला सद्बुद्धी राहो आणि त्यांनी खरी देशसेवा करो व त्यांना उदंड यश प्राप्त होवो.