परदेशी भारतीय लोकांना शिव्या द्यायची अनेकांना सवय आहे. पण भारत जेव्हा अशा लोकांना दुय्यम नागरिकत्वासारख्या सवलती देतो ते त्यांच्या राष्ट्रप्रेमाचे बक्षिस म्हणून नाही तर त्यांचे भारतीय संस्कृतीशी जे नाते आहे त्याचा काही फायदा मिळत असला तर घ्यावा म्हणून. एक soft corner असतो त्याचा उपयोग करुन घ्यावा हा तो हेतु.
 उपरनिर्दिष्ट विशिष्ट गटाच्या नाकाला विशेष झोंबणारी एक गोष्ट म्हणजे परदेशी भारतीयांची सांपत्तिक स्थिती चांगली असते. इच्छा असल्यास ते भारतात लहान मोठी गुंतवणूक करु शकतात. काही मातब्बर उद्योगही सुरु करु शकतात.
 तर हा एक सरळसरळ व्यवहार आहे. परदेशी भारतीयांना व्हिशाबिशाशिवाय मुक्त येजा करु द्यायची आणि त्याबदल्यात काही तरी गंगाजळी पदरात पाडायची. इथे परदेशी भारतीय निःस्वार्थी आहेत का, ते पुरेसा त्याग करत आहेत का हे प्रश्न अप्रस्तुत आहेत. भारतात असताना भारतीय कायद्याचे पालन केले की झाले. 

  तसे भारतात राहून नीच कृत्ये करुन उपजीविका करणारे आहेतच की. केवळ ते भारतात रहातात म्हणून त्यांना परदेशी भारतीयांपेक्षा श्रेष्ट का मानायचे?