नमस्कार ,

मी मूळचा पुणेकर नसल्यामुळे असेल कदाचित पण मला या पाट्यांचा कधीकधी खूप राग येतो. कारणे खूप असतात. पण राग येतो हे खरे.

काही कारणे...

१) अनावश्यक सूचना - ( काही सूचना लिहाव्या म्हणून लिहिल्या जातात.) लाकडी जिना चढताना आवाज हा होणारच, तरीही आवाज करू नये...

२)घंटी जोरात वाजवू नये... बाळ उठतं( घंटी काढा अथवा हलक्या आवाजाची लावा... पण नाही आम्ही पुणेकर... बदलावं ते इतरांनी...)

३) काही पाट्यांवरील मजकूर पाहला असता तर मनात प्रश्न उठतो हे मराठी मानसाची उन्नत नागरी अवस्था आहे की यांत्रीकीकरन? कुठेही कसलीही पाटी लावलेली असते आणि ...अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल..! ( पुण्यातील लोकांचा नेमका समज तरी काय? कायदा समाजासाठी का समाज कायद्यासाठी?)

४) समाजावर अजिबात विश्वास नसल्याचे लक्षण म्हणजे ह्या असंख्य आणि अनावश्यक माहिती व सूचना ( समोरच्या व्यक्तीस अजिबात डोकं नसल्याचे मानून लिहिल्या गेलेल्या) आहेत असं मला वाटतं.

शेवटी एवढं सगळं करून तरी काय अजाणतेपणी का होईना आपण समाजातच राहतो तेंव्हा समाज भान ठेवून वागलं तर सर्वकाही सुरळीत चालेल असं मानावं लागतं. समाजावर विश्वास ठेवावा लागतो. तो पाटी लिहून ठेवा अथवा न लिहून.

आणि ह्या पाट्या मनोरंजना खेरीज काहीतरी काम करतात का? अस्सल पुणेकर ह्या वाचत तरी असतील का?

नीलकांत