भाष, महेश, मी मराठी यांच्याशी संपूर्ण सहमत. द्वारकानाथ, चित्त यांच्याशी असहमत.

मला असे वाटते की हिंदीत संस्कृत शब्द आणि प्रत्यय आदी अधिक प्रामाणिकपणे वापरल्या जातात.

हिंदीमध्ये संस्कृत शब्दांचा बरेच वेळा विपर्यस्त वापर केला जातो असे माझे मत आहे. त्यामानाने मराठीतला वापर मला अधिक प्रामाणिक वाटतो.
उदा१. मराठीत ज्याला "निषेध" म्हणतात त्याला हिंदीवाले "निंदा" म्हणतात, हे विचित्र नाही का?
(आणि ज्या जागी "निषिद्ध" म्हटले पाहिजे तिथे ते "निषेध" लिहितात. उदा१ब. "धूम्रपान निषेध")
उदा२. "स्मगलर" साठी त्यांनी "तस्कर" असा शब्द नव्याने रूढ केला, पण त्या शब्दाचा तसा अर्थ संस्कृतात नाही अशी माझी समजूत आहे, तेव्हा या विशिष्ट वापरात तरी (संस्कृतशी) प्रामाणिकपणा जाणवत नाही.

हिंदीवाल्यांना नवनवीन संस्कृतोद्भव शब्द वापरात आणून रूढ करण्याची हौस आहे खरी, पण त्यांना प्रेरणास्रोत समजून त्या सगळ्या शब्दांचा आपण मराठीत सर्रास स्वीकार वा वापर करू लागलो तर आपण स्वतःबरोबर मराठीला खड्ड्यात घेऊन जाऊ असे माझे प्रामाणिक मत आहे. हिंदीवाल्यांविषयी यथोचित आदर बाळगून म्हणा वा त्यांना संशयाचा पूर्ण फायदा देऊन म्हणा, संस्कृत शब्दांचा मराठीतला व हिंदीतला वापर वेगळा नि वेगळ्या अर्थाने आहे/असतो याचे भान ठेवणे बरे.

 

दिगम्भा