खरोखरच एक दर्जेदार विडंबन !
प्रामाणिकपणे सांगतोय, मला आपल्या पूर्वीच्या कविता इतक्या आवडल्या नव्हत्या.(अर्थात मी इथे फक्त कवितांबाबत बोलतोय !)
'केळकर' मला बालिश वाटली तर 'झुकझुक' खोटा अभिनिवेश घेऊन लिहिल्यासाठी वाटली - त्यातले अनेक मुद्दे पटले नाहीत - कोंकण रेल्वे ही त्या भागातल्या लोकांच्या विकासाचं एक महत्वाचं साधन ठरेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं नि कोंकण रेल्वेमुळं खरंच जर तुमच्या मनात कसलं दुःख सलसलत असतं तर याहून चांगली, एखादी जहाल कविता बाहेर पडली असती असं माझं मत आहे! तुमच्या मनात सहज एक विचार आला नि कविता लिहिली असं तर झालं नाही ना?
'एखादी आळशी संध्याकाळ' चांगली होती, पण तिला उत्कृष्ट म्हणता येणार नाही.त्यातली काही वाक्यं मला खटकली.
उदा.
मग अगदी महिनाभर कामाखाली जळू दे!!
जळू हा शब्द मला नाही आवडला.
असो, मी मला जे वाटलं ते सरळ सांगितलं, राग नसावा. मीही एक नवशिका लेखक आहे नि माझ्याही लेखनात अशाच, याहूनही गंभीर त्रुटी असतात याचीही मला जाणीव आहे. पण एकुनच आपल्या मनोगतावर फक्त गोड गोड कौतुकच केलं जाऊ नये तर चुकाही (ज्या जाणून घेण्याची कवी/लेखकाला खरी गरज असते.) सांगितल्या जाव्यात या मताचा मी आहे. असं होताना दिसत नाही, हे बदलायला हवं, नाही का?
असो,पण या नि आपल्या पूर्वीच्या कवितांमधे मला कमालीचा फरक जाणवला ! ही विडंबन कविता खूपच सुंदर आहे. एक मुख्य मुद्दा धरून त्या अनुषंगाने कडव्यांची रचना समर्पकपणे केली गेलेली आहे. कोणती कडवी आवडली ते सांगणार होतो, पण मग जाणवलं की सगळीच कडवी आपल्याला आवडलीत. ;)
अजुन काय? अशीच येऊद्यात अजुन विडंबने !
एक_वात्रट