माझी काही मते / प्रश्न -

१) मुळातच आरक्षण म्हणजे गुणवत्तेशी तडजोड. एखादा मागासवर्गीय खरोखरच गुणवान वा जात्याच बुध्दिमान असेल, तर त्याला आरक्षणाची गरजच काय ? याउलट जर तो मुळातच अक्षम असेल, तर कितीही आरक्षण दिले तरी त्याचा फायदा होईलच याची खात्री काय ? आणि हे कोणत्याही जातीच्या माणसाबद्दल खरेच आहे - यात दुमत नसावे.

२) जे मागासवर्गीय सुशिक्षित / सुखवस्तू असतात, अभ्यासात उत्तम असतात, त्यांनी सामान्य वर्गातून प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, केवळ विशिष्ट जातीत जन्म घेतला म्हणून आरक्षणाची ढाल पुढे करून जागा पटकवावी हे कितपत योग्य आहे ? मागासवर्गीयांना हा दुहेरी फायदा मिळतो.

३) आरक्षण हे जातीय निकषाऐवजी आर्थिक निकषावर असावे.

४) स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी केलेली आरक्षणाची तरतूद आता सुमारे ५९ वर्षांनंतरही आणखी किती वर्षे चालणार आहे ? का आता १०० टक्के आरक्षण हवे आहे ?

५) आरक्षण ठेवायचेच तर ते किती टक्के असावे याची साधकबाधक चिकित्सा कोणी केली आहे का ?

६) आरक्षण हा कायमस्वरूपी तोडगा आहे का ?

७) आजवर भरघोस आरक्षण ठेवले गेलेले असूनही आजही कित्येक सरकारी शाळा, कॉलेजे, आस्थापने, केंद्रीय उपक्रम, आय आय टी सारख्या संस्था यांमध्ये हजारो जागा रिकाम्या का पडून आहेत ?

८) वरील प्रश्नांबद्दल आरक्षण-समर्थकांचे काय म्हणणे आहे ?

धन्यवाद.