हा कदाचित हा मुद्दा एका वेगळ्या चर्चेचा विषयही असेल. पण पहिलीपासून मराठी शाळांमधे इंग्रजी शिकवली जाण्याच्या प्रयोगाबाबत अनुराधा गोरे यांनी नऊ महिन्यांपूर्वी काय म्हटलंय ते पाहण्यासारख़ं आहे. आपल्यासारख्या शिकल्या सवरल्या व इंग्रजी जाणणाऱ्या पालकांना ही सोय कदाचित फ़ार चांगली वाटेल, पण महाराष्ट्रभरात जेव्हा हा प्रयोग ४-५ वर्षे राबवला गेला तेव्हा तो सपशेल नापास झाल्याचं चित्र आहे. हीही बाब खेदाची आणि काळजीची. हा प्रयोग जर यशस्वी होता तर मग मुलांच्या हिताशी तडजोड न करता मराठी माध्यमाची निवड करू इच्छिणाऱ्या [माझ्यासारख्या] पालकांना त्याचा आधार झाला असता.
http://maharashtratimes.indiatimes.com/cms.dll/html/uncomp/articleshow/1187088.cms 

... वरील मूळ चर्चेबाबत माझं स्वच्छ मत असं की इंग्रजी / हिन्दी / उर्दू / वा इतर कुठल्याही माध्यमाच्या शाळांत महाराष्ट्रात मराठी विषय पहिलीपासून सक्तीचा असलाच पाहिजे. तडजोड नाय् न् दयामाया नाय्!