स्थल, काल आणि गति बदलत राहणे हा भौतिक सिद्धांत आहे. त्यामूळे १९२५, २००५ आणि २०८५ ह्यात काही साम्य असण्याचा वादच उद्भवत नाही! परंतू 'तत्त्व', 'निष्ठा' आणि 'मुल्ये' ही मूलभूत अंगाने बदलू नयेत असा एक संकेत आहे.

'उडदामाजि काळे-गोरे' हा न्याय मल्याळी - चायनीज किंवा अजून जगाच्या पाठीवरील कोणत्याही जमातीला लागू असावा असे आम्हाला वाटते. चिनी किंवा मल्याळी लोकांचे कौतूक वाटणे आपला व्यक्तिगत मोठेपणा आहे, आम्हाला त्याविषयी आदर वाटतो! त्याचवेळी कुठ्ल्याही गोष्टिचे तर्कनिष्ठ विवेचन किंवा विरोध करण्याचा अधिकार देण्याचाही आपण मोठेपणा दाखवता याची आम्हाला खात्री आहे. तमाम महाराष्ट्रीय जनतेला (ज्यात टिळक, सावरकरादी प्रभूति, मंगेशकर, तेड़ुलकरादि भारतभूषण आणि अशीच बडी व सर्व वडिलधारी मंडळी यांना) आपल्याला आपल्या 'निष्क्रीय', 'बावळट' आणि 'दुराभिमानी' इत्यादि विशेषणांमध्ये सामिल करायचे नव्हते हे आम्ही जाणून आहोत!

आपण उल्लेखलेल्या पूर्वी परदेशात राहून गेलेल्या मंडळीबद्दल आपल्याला वाटतो तितकाच आम्हालाही आदर आहे; तथापि,  "वेदमंत्राहून आम्हा वंद्य 'वन्दे मातरम'! "अशी श्रद्धा असणारे सर्वच लोक आम्ही वंदनिय मानतो.

सुनामी सारख्या संकटात केलेली मदत ही कर्तव्यबुद्धिने एका माणसाने दुसर्‍या माणसाला केलेली असते. त्याला मदत किंवा सहानूभूति असे काही म्हणण्यापेक्षा दोन क्षण सहकार्य म्हणू या! आणि परदेशस्थ भारतियांपेक्षा ज्या लोकांचा भारताशी दूरदूर पर्यंत ही संबंध नाही अश्या लोकांनीही या क्षणी सहकार्य, औदार्य दाखवले असते. हा मनूष्यस्वभाव आहे.....वेगळे काही नाही!

आमचा विरोध आहे तो जाहिरातबाजीला. एखादी गोष्ट पटली नाही हे सांगण्यासाठी ज्या विशिष्ट कुबड्या वापरल्या जातात त्याला! हे वेगळेपण जपण्याची खरोखर आवश्यकता आहे का?

केतकरांना प.भां. बद्दल अनादर आहे हे स्वतःचे मत "स्वतःचे" म्हणून सांगण्यात काय जास्त धारिष्ट्य लागते? संघाचे अधिकृत मत सांगण्यासाठी प.पू. सुदर्शनजींनी श्री राम माधवांची नियुक्ति केली आहे ना. आमचा विरोध इथेच संपत नाही. गांधीवादाचा विषय असो, इतिहासातली चुकिची पाने बदलण्याचा विषय असो, काही लोक स्वतःचे मत मांडताना, जणू काही हेच काय ते संघाचे अधिकृत मत आहे असे धोपटतात आणि यामूळे सुरूवात होते एका विचित्र गैरसमजाला. "....त्यातून आम्ही संघाचे पडलो ना" असे काहीतरी पालुपद! यामूळे धोका असतो की व्यक्तिच्या गूणासोबत तिचे दोष ही संस्थेला चिकटले जातात. हा जाहिरातबाजिचा मोह टाळायलाच हवा.