आपणही वरचढ आवाज केला पाहिजे, हे विसोबा तात्यांचे शब्द वाचताना मला समर्थ रामदासांच्या एका प्रसंगाची आठवण झाली. समर्थ भारत भ्रमण करित असताना पंजाबात गेले. तेथे योगायोगाने त्यांना शीख धर्मगुरू गोविंदसिंग आपल्या सशस्त्र शिष्यपरिवारासह भेटले. समर्थांनी त्यांना शस्त्रांचा त्याग का केला नाही म्हणून विचारले. गुरूंचे उत्तर "अंत्यस्त्यजै "  असे होते.  समर्थांनी  कारण विचारले तेव्हा गुरूंनी नेमके  आपण वरचढ आवाज करित नाही ,तोपर्यंत अन्याय चालूच राहतील व यासाठीच संन्याशानेही शस्त्र धारण केलेच पाहिजे अशाच आशयाचे स्पष्टीकरण दिले होते. (संदर्भः राष्ट्रद्रष्टे रामदास ,ले. सुनील चिंचोळकर)प्रश्न एकच उरतो ,आज हे वर्तन "कायदा हातात घेतल्यासारखे" ठरू शकते , त्याला काय उत्तर द्यावे.

अवधूत.