जयंतराव खूपच चांगल्या विषयाची बहारदार सुरूवात केली आहेत.
त्याखातर तुम्ही अभिनंदनास पात्र आहात.
मला नेहमीच त्यांच्या गीत रामायणातील अयोध्येच्या वर्णनातली एक जागा अवश्य आठवते.
अतृप्तीचा कुठे न वावर नगरी घरी अंतरी ।
अयोध्या मनुनिर्मित नगरी ॥
असे म्हटलेले आहे.
प्रमोद महाजनांच्या घटनेमुळे
अतृप्तीच्या वावराच्या, आपल्या आजच्या आयुष्यातील अनेक जागा मला सलू लागल्या आहेत.
पण गदिमांचे कौतुक हे की अतृप्तीच्या वावराचे महत्त्व त्यांनी पुरेपूर ओळखले होते. आणि ती नसेल अशा प्रकारचा आदर्श शहराची रचना मनुने केली असे सार्थ वर्णन करण्यास त्यांची प्रतिभा स्फुरली.