चांगला लेख!

गदिमांची कुठलीही कविता किंवा गाणे हे एखाद्या उत्तम चित्राप्रमाणे असते.  गाणे ऐकून आपल्या डोळ्यांपुढे त्यातील प्रसंगाचे तंतोतंत चित्र उभे राहते.  उदा.  राम जन्मला ग सखे राम जन्मला!

हे सगळे गीत मला आत्ता आठवत नाही, पण काही ओळी .....

कौसल्याराणी हळू उघडी लोचने

तृप्त होय माय जणू पुत्रदर्शने

ओघळले आंसू .............

कंठ दाटला,  राम जन्मला.............

किंवा

युवतींचा संघ एक गात चालला........

डोलतसे पृथ्वी  .......... शेष डोलला (अचूक ओळ आठवत नाही, क्षमस्व!)

यासारख्या ओळी अप्रतिमच!

खरंतर गीतरामायण हाच चर्चेचा एक स्वतंत्र विषय होईल, नाही का?

स्वाती