प्रश्न मराठी-कानडी भेदभावाचा नाही आहे. (तसा भेदभाव मला नाही वाटत इथे कोणी करत आहे.) परंतु कुमार गंधर्वांचे 'जल्म जल्मलो' हे 'कलाकाराच्या स्वातंत्र्या'पेक्षा भाषिक उच्चाराविषयीच्या अज्ञानातून उद्भवले असावे, असे वाटते.

अर्थात त्यात निश्चित काही गैर असावे, अशातला भाग नाही. आणि कुमार गंधर्वांच्या गायकीपुढे या चुका दुर्लक्ष करण्याजोग्या आहेत.

आणि हो, कुमार गंधर्वांच्या मराठी गाणी म्हणतानाच्या चुका आणि महंमद रफीचे मराठी गाणी म्हणताना होणारे मराठीवरचे अत्याचार यांत मात्र निश्चित भेदभाव होतो, बरं का!

- टग्या.