अगदी खरयं तुमचं म्हणण..लेख फारच आवडला.

विरोधाभास हा की ह्या संस्कृतीच्या पाठपुराव्यानेच मला प्रश्न विचारायला शिकविले. लहानपणापासून आजूबाजूला पाहिलेल्या संस्कृतीच्या नावाखाली चाललेल्या दांभिकतेने स्वतःकडेच उघड्या डोळ्यांनी पाहायला भाग पाडले.

एकदम पटलं. कधीतरी वाटत की जग ज्या झपाट्याने बदलतयं त्यावेगात आपलं घर बदलू नये, वाटतं की आपण उंबरठ्यावर उभे आहोत. . (उपमा वापरत्ये)नक्की कुठली बाजू बरोबर हे ठरवणं कठीण होतं असं म्हणणार नाही पण मनात अनेक प्रश्न नक्कीच उभे रहातात.

मग वाटत की जस जस आपण मोठे होत गेलो तसतशा जगाच्या कक्षा वाढ्त गेल्या. जगाच खरं स्वरुप जास्त ध्यानात यायला लागलं. यातून या आधीची पिढी ही गेली असावी आणि या नंतरचीही जाईलच. मग माझ्याच बाबतीत असं काहीतरी वेगळ घडतय असं नाही. आपली मतं पक्की असतील आणि दिशा ठरलेली असेल तर दाराच्या या बाजूचे किंवा त्याबाजूचं जग पेलण्याची ताकद नक्कीच आहे. तेव्हा डोळे आणि मनाची दारं बंद करुन घेण्यापेक्षा उघडी ठेवणे कधीही चांगलच.

हे हलाहल पचविण्यास सर्वसामान्य माणूस नक्कीच समर्थ आहे. त्याची चिंता विद्वत्जनांनी बाळगू नये.

पटलं.