वरदा,

आपण लिहीलेल्या "वीज चमकली चक् चक् चक्" ची सुरुवात
"आभाळ वाजलं धडाडधुम्, वारा सुटला सूऽसूऽसूम्" अशी आहे.

उरलेली सर्व कविता तर तुम्ही लिहीलेली आहेच.

अजुनही अनेक कविता मलाही आठवतात...
उदा.
"आम्रतरू हा धरी शिरावर प्रेमळ निज सावली..."

"तळ्याकाठी गाती लाटा.. लाटामध्ये उभे झाड
झाडावर धीवराची दिसे चोच लाल जाड..."

"घाटातली वाट काय तिचा थाट
मुरकते गिरकते लवते पाठोपाठ..."

"झुले बाई झुला माझा झुले बाई झुला
आता होता भुईवर जातो आभाळाला..."

"गवताचं पातं वार्‍यावर डोलतं डोलताना म्हणतं खेळायला चला..."

वेळ मिळेल तश्या अजुन काही लिहीनच.. सद्ध्या स्वतःला बालपणींच्या आठवणींत रमण्यापासून थांबवतो आहे. पण तुमचा विषयच असा होता, की कार्यालयात[office] असुनही थोडं लिहीलंच.

अमित चितळे