एक गोष्ट लक्षात आली. एकलव्य आणि तात्यांना मूळ यादीतील चारही गोष्टींबद्दल अभिमान वाटतो. मृदुलांना कशाचाही नाही. त्यांची मते स्पष्ट आहेत.
पण या दोन टोकांच्या मध्ये आपण आहोत. मला दोन गोष्टींबद्दल वाटतो, तर तुम्हाला तीन. तुम्ही तुमच्या यादीतून जात का वगळली - आणि धर्म का ठेवला - हे तुम्हाला सांगता येईल का? (तुम्ही जात जाणूनबुजून वगळली नसल्यास दुर्लक्ष करा)
अश्या 'व्यक्तिगत' अभिमानापुढे देश, धर्म, भाषा हे 'परके' वाटू लागतात. "मला काय फरक पडतो?" आणि "मला काय करायचेय?" ह्या प्रवृत्ती अश्या विचारांना कारणीभूत आहेत असे वाटते.
तुमचे अभिमानी जातभाईही मग असाच युक्तिवाद करू शकतील, होय की नाही?
- कोंबडी