कोंबडीताईंनी दिलेल्या चर्चेच्या प्रस्तावा निमित्ताने स्वतःच्या मानसीकतेला पुन्हा चाचपडून पाहीलं आणि लक्षात आले की,मला माझ्या अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासुन ते अनेक मोठ्या गोष्टींचा अभिमान वाटतो.
मला माझ्या माणसांचा, माझ्या घराचा,माझ्या गावाचा, राज्याचा ,भाषेचा,देशाचा,धर्माचा,जातीचा,आत्ता जिथे राहतेय त्या देशाचा आणि पूर्ण मनुष्य जातीचा कट्टर अभिमान वाटतो. 
वरीलपैकी कोणत्याही बाबतीत एखादी चांगली गोष्ट ऐकली माझं मन अभिमानानं उचंबळून येतं. आणि एखाद्या बाबतीत वाईट गोष्ट घडली तर तेवढच वाईटही वाटतं..