एकलव्य राव तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे. मला खोडून काढायचं नाही तेही खरच आहे. परंतु कधी कधी आपण फार ढोबळपणे विषयाकडे पहात असतो. (आपण म्हणजे आपण सर्व तुम्ही नाही)
जसे भारताला कमी लेखणारे लोक आहेत तसे इथे राहून सामाजिक संस्थांना मदत करणारे ही आहेत. माझ्या अगदी जवळच्या आणि ओळखीच्या ३-४ कुटूंबांनी अनाथ मुले भारतातून दत्तक घेतली आहेत आणि तेही आपली पोटची पोरं असताना, त्याअर्थी परदेशात राहूनही ते कसल्यान कसल्या प्रकारे हातभार लावत आहेत.
पुढच्या पीढीबद्दल म्हणाल तर ती भारताविषयी अनभिज्ञ नाही. असेल तर मी त्याला त्यांच्या पालकांचा दोष म्हणेन. एक भंकस उदाहरण मनात का आल माहित नाही पण तरीही येथे लिहिते.
अनुष्का दांडेकर, मल्लिका अरोरा, लिसा रे वगैरे सारखी "पुढची पीढी" पुनश्च भारतात स्थायिक होऊ पहाते आहे, म्हणजेच "असतील शिते तर जमतील भूते" एवढच.
चांगली उदा. द्यायला माझ्याकडे नाव उपलब्ध नाहीत परंतु खाद्य क्षेत्रात तसेच कपड्यांच्या क्षेत्रात हल्ली बरीच भारतीय "पुढची पीढी" उतरली आहे. या वर्षी "मद्रास" या कल्पनेच्या कपड्यांनी अमेरिका ओसंडून वहाते आहे. हे व्यावसायिक गोरे नाहीत, ग्रीन कार्ड होल्डरही नाहीत, H1-B वाले तर नाहीच नाहीत. पण ही सर्व पीढ्यानपीढ्या इथे राहिलेले परदेशस्थ भारतीय मंडळी आहे.
त्यातले बहुतेक करुन गुजराथी-पंजाबीच असावेत, पण त्यांच्यामुळे देशाला उत्पन्न येत आहे (IT पेक्षा वेगळ्या क्षेत्रातून). हे उद्योग धंदे अधिक वृद्धिंगत झाले तर आपल्या देशांतील लघू उद्योगांनाच चालना मिळणार आहे. या लोकांना वर देसी महाराज हसले आहेत पण त्यांची चिकाटी पहा. त्याला "लोचटपणा" म्हणण हे आपण मराठी माणसं चांगलं करु शकतो बाकी.
तेव्हा मला वाटत हा ज्याचा त्याचा व्यक्तीगत प्रश्न आहे आणि परदेशी जाणारी व्यक्ती कर बुडवी, आपमतलबी म्हणणे तितकेसे खरे नाही असे मला वाटते.
चू. भू. द्या. घ्या.