मला जात देश धर्म कश्शाकश्शाचा अभिमान नाही असे म्हणणाऱ्या मृदुला याना तीन प्रश्न विचारतो १)भारताची कोणतीही मॅच दुसऱ्या कोणत्याही देशाबरोबर चालू असेल तर त्याना भारतानेच जिंकावे असे वाटते की नाही?२)कल्पना चावला भारतीय होत्या याचा अभिमान वाटला की नाही?३)आपले मूल आणि शेजाऱ्याचे मूल एकाच परीक्षेला बसत असेल तर आपल्या मुलास (त्या मुलापेक्षाच काय पण सर्व मुलाहून)अधिक गुण मिळावे असे वाटते की नाही? या तिन्ही प्रश्नांची त्यांची उत्तरे नाही अशी मनापासून असतील तर त्यानी खरोखरच संतपद प्राप्त केले आहे अहो ज्ञानेश्वरांसारख्या संतालाही स्वभाषेचा अभिमान सोडवला नाही आणि म्हणून ते म्हणाले माझा मराठाचि बोलु कवतुके तरी अमृतातेसी पैजा जिंके इत्यलं !