माणूस हा कळपाने रहाणारा प्राणी आहे. त्याची शक्ती ही त्या समूहाच्या एकजुटीवर अवलंबून असायची. लाखो वर्षे माणूस आदिम संस्कृतीत राहिला आहे. नैसर्गिक शस्त्रे फारशी नसल्यामुळे (सुळे वा नखे) माणूस तग धरतो का नाही हे तो समूह किती शक्तीमान आहे ह्यावर ठरत असे. समूहची शक्ती ही त्यातिल घटक दुसऱ्याकरता किती जी टाकतायत यावर ठरत असेल. आपल्या टोळीतील माणसावर उदंड प्रेम अगदी जीव द्यायची तयारी हे एक प्रमुख लक्षण. असे ममत्व वाढावे म्हणून रुढी परंपरा वेषभूषा सण धर्म विधी बनले. आणि त्या परंपरांचा अभिमान बाळगणे हे त्यातून बनले. जे गट अशा पद्धतीने सबळ बनले नाहीत ते टिकले नाहीत.
  आजच्या काळातही ही उपजत प्रेरणा (इन्स्टिंक्ट) जिवंत आहे. विविध खेळ बघा. भारतात क्रिकेटच्या टीमवर लोक कसा जीव ओततात ते पहा.
तात्पर्य जातीचा धर्माचा कुळाचा भाषेचा अभिमान ही ह्या नैसर्गिक प्रेरणेची अभिव्यक्ती आहे. त्या जातीत कुळात भाषेत वा देशात जन्म होणे हा योगायोग असला तरी हे बदलत नाही.