कोंबडीदेवी नमस्कार,
तुमची चर्चा पुरेशा गांभीर्याने आणि अभ्यासाच्या आधारे चालली असल्याबाबत माझी खात्री पटली आहे. तुमची प्रामाणिकता आणि मानवी भावना (अभिमान शब्दातून व्यक्त होणारी) मुळातून तपासून पाहण्याची तुमची कल्पना मला भावली.
त्या सर्व शब्दांची व्याख्या करणं हे तुमच्याच काय पण माझ्याही आवाक्याबाहेरचं आहे.
तुमच्या तपासाबाबत मी पुरेसा उत्सुक झालो आहे. मलाही त्यात स्वारस्य वाटत आहे. त्याबाबत अभिमान(?) वाटू लागला आहे. असो.
तुमच्या तपासासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा!
मात्र वृकोदरांचे म्हणणे मला पटते. अभिमान नसेल तर मनुष्य टिकाव धरू शकणार नाही. जीगिषा कमी होईल. तीव्र स्वरूपाचा अभिमानच जीवनाशा जाज्वल्य करू शकतो असा माझा विश्वास आहे. काय म्हणता?