मनुष्य वर्गात जन्म होणे..हीच खरी जगंनियंत्याची निवड. मग मात्र चालु होतात आपापल्या आवडी. एक लक्षात घेतले पाहिजे की, जन्माला येताना आपण मेंदू व ह्रदय ही दोन महत्वाची इंद्रिये घेऊन येतो (निवड अजिबात नाही). ह्रदयाची जडणघडण, वाढ व कार्य आयुष्यभर चालू असते.
आवडीनिवडीची प्रक्रिया, मानसिक/बौद्धिक जडणघडण, विचारशक्ति यासारख्या बाबी मेंदूशी निगडित असतात. आपल्या समाजानुसार, सभोवतालाचे वातावरणानुसार मेंदूचा विकास होण्याची प्रक्रिया कमी-जास्त होत असते. यातूनच मेंदूला धर्म, जात-पात, राष्ट्र, नीतीमुल्ये, व तत्सम बाबींची जाणीव होऊ लागते. वारंवार दिसणाऱ्या, ऐकणाऱ्या गोष्टींचा आपल्या विचारप्रक्रियेवर सतत परिणाम होत असतो. यातूनच तयार होतो एक शब्द "अभिमान" !
काळानुसार अभिमानाची व्याप्ती, संकल्पना, तीव्रता ही सतत बदलत असते.
'वसुधैवकुटंबकम' नुसार जगाच्या मानसिक, बौद्धिक, वैचारिक सीमारेषा बदलत आहेत, आपल्याप्रत्येकाला याची जाणीवही आहे.
तेव्हा, माझ्या मते 'मनुष्य' प्राणीवर्गात जन्माला येण्याचा अभिमान हा सर्वश्रेष्ठ यात वाद नसावा !!! सर्वप्रकारच्या चांगल्या गोष्टींचे आदान-प्रदान याचा अभिमान?
असो. मीही याच समाजाचा एक भाग आहे आणि पाण्यात राहून माशाशी वैर घेणे मला अयोग्य वाटते. तदनुसार, मला माझ्या मातृभाषेचा, मातृभुमीचा, आणि मनुष्यजन्माचा अभिमान वाटतो !!!