नमस्कार,

हा माझा पहिलाच संदेश आहे. त्यामुळे जर का मी काही कमी जास्त लिहून गेलो तर क्षमस्व...

माझ्या आठवणी प्रमाणे हे काही नवीन नाही. पुर्वी रुना लैला नामक एक बांगलादेशी तरुणी भारतात असेच थैमान घालून गेली होती. त्या नंतर बाबा सैगलने असाच वात आणला होता. त्या पुर्वी 'आप जैसा कोई मेरे जिंदगी मे आये तो' वाल्या नाझीया हसनने तर लता मंगेशकरांपेक्षा आपण पुढे जाऊ अशी दर्पोक्ती केली होती. या पैकी आता किती लोकांची गाणी आपण अजुन ऐकतो?

परंतू, कुंदनलाल सैगल, बालगंधर्व, दिनानाथ मंगेशकर, लता, आशा, तलत, मन्ना डे, रफ़ी, बाबुजी यांची गाणी मात्र जुनीच होत नाहीत.

जाऊदे, या वादात वेळ घालवण्या पेक्षा छानसे एखादे गाणे एकावे ...

 

आपला,

माधव कऱ्हाडे