तुम्ही लिहिलेलं आवडलं, मात्र काही मुद्द्यांविषयी मतभिन्नता आहे.

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वर्तुळांचा केन्द्रबिंदू "मी" असतो हे मान्य. परंतु तुम्ही सांगितलेली सर्व वर्तुळे प्रत्येकाच्या भोवती असतीलच आणि त्यांची उतरंड तुम्ही सांगितल्याप्रमाणेच असेल असे वाटत नाही.

कोणाचाच अभिमान नसल्यावर कोणासाठी स्वार्थत्याग करण्याचा प्रश्नच कोठे उद्भवतो?

हे पटलं नाही. जाणूनबुजून स्वार्थ"त्याग" करणारे श्रेष्ठच, पण मुळात "स्वार्था"चा लवलेशही नसणारे संत महात्मे असतातच की. ("संत तुकाराम" या चित्रपटातली तुकारामांची व्यक्तिरेखा आठवा. अशी व्यक्ती अस्तित्त्वात असणे हे मला अशक्य वाटत नाही.)

ज्यांना कशाचाच अभिमान नाही त्या सर्वांना नक्की "जीवन कळले हो" असं मला म्हणायचं नाही. पण कुणी सांगावं - कीबोर्ड कुटून तुमच्यामाझ्याशी मनोगतावर गप्पा मारणाऱ्या एखादीला/एखाद्याला ते कळलं असूही शकेल.

- कोंबडी