हिमेश रेशमियाचे संगीत कितपत दर्जेदार वगैरे आहे हे मी सांगु शकत नाही( मी तेवढी तज्ञ नाही या क्षेत्रात) पण त्यात नाविन्य नक्कीच आहे. मला त्याची गाणी ऐकायला बरी वाटतात. भारतातल्या बहुतांश लोकांना वाटत असावित म्हणूनच तो आज चालतोय.
जुन्या जमान्यातले अनेक श्रेष्ठ गायक हे त्यांच्या जागी श्रेष्ठच आहेत. आज हिमेशची चलती आहे म्हणून रफी,किशोर,हेमंतकुमार यांचं श्रेष्ठत्व कुणी डावललय असा त्याचा अर्थ होत नाही. पण लोकांना सतत काहीतरी नाविन्य हवे असते जे हिमेशच्या संगीतातुन मिळतय. याचा अर्थ लोकांची अभिरुची हीन झालीय असाही नाही. त्याच्या संगीतात वैविध्य नसेल तर लोकांना त्याचा कंटाळा येऊन आपोआपच तो मागे फेकला जाईल!