राम गोपाल वर्मा च्या जंगल चित्रपटात दरवडेखोराच्या टोळीतल्या एका लुटारूला त्याच्या मित्राला संपवण्याची आज्ञा होते. आजपर्यंत ज्याच्या सहकार्याने अनेक मोहिमांमधे पडेल ते काम करणारा तो पंटर ही पण अशीच एक कामगिरी आहे असं समजून याला तयार होतो. "आता मी तुझ्या मानेवर सुरी फिरवणार आहे. तुला फक्त मरायचं आहे. काळजी कशाला करतोस? निर्धास्त रहा. तुला मुळीच दुखणार नाही. मी अगदी हलक्या हाताने तुला मारेन" अशी तो त्या मरणाऱ्या मित्राची समजूत घालतो. राजपाल यादव ने हे काम केले होते.त्याचं थंड रक्त आणि एखाद्याच्या पायातलं कुसळ काढताना त्याची समजूत घालावी तशा स्वरात आपल्या साथीदाराला "मरायला" तयार करणारं त्याचं ते संभाषण ऐकून अंगावर काटा आला होता माझ्या.  त्या गळ्यावरून सुरी फिरवण्याच्या प्रसंगात नव्हतं इअकं सामर्थ्य त्या" कुच्छ नही होगा." या उद्गारांमधे होतं.

--अदिती