१)भारताची कोणतीही मॅच दुसऱ्या कोणत्याही देशाबरोबर चालू असेल तर त्याना भारतानेच जिंकावे असे वाटते की नाही?

हो. यात अभिमानाचा संबंध कुठे आला? तरी तुम्हाला एक प्रश्न पाकिस्तान-इंग्लंड अश्या सामन्यात तुम्ही कोणाला पाठिंबा देता? भारतावर दीडदोनशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्लंडला की त्रासदायक शेजाऱ्याला?

२)कल्पना चावला भारतीय होत्या याचा अभिमान वाटला की नाही?

नाही. का वाटावा काही कळले नाही. त्या त्यांच्या कष्टाच्या, बुद्धिमत्तेच्या जोरावर मोठ्या झाल्या. त्यांचे कौतुक वाटले.

३)आपले मूल आणि शेजाऱ्याचे मूल एकाच परीक्षेला बसत असेल तर आपल्या मुलास (त्या मुलापेक्षाच काय पण सर्व मुलाहून)अधिक गुण मिळावे असे वाटते की नाही?

जर आपल्या मुलाची पात्रता असेल तर नक्कीच. आपल्या कुटुंबीयांना यश मिळावे असे वाटण्यात पुन्हा (देश, धर्म, जात, भाषा यांचा) अभिमान कुठे आला?

अभिमान म्हणजे
'आमचा देश कसला भारी आहे, माहितेय.., सगळ्या रंगाची माणसं, सगळ्या प्रकारचा भूगोल (इ इ), नाहीतर तुमचं हे बेट!'
'आमची मराठी भाषा कसली पावरबाज आहे, माहितेय.., कसल्याही प्रकारचे आवाज लिहिता येतात, वाक्प्रचार-म्हणी वगैरे तर काय बघायलाच नको! नाहीतर तुमची भाषा एकाच स्पेलिंगेचे किती उच्चार, नुसता घोळ..'
अशी वाक्ये असा माझा समज आहे. थोडक्यात म्हणजे माझे आणि तुमचे याच्या तुलनेत माझे कसे जास्त चांगले ही भावना. तसे नसेल तर अभिमानाची योग्य ती व्याख्या करून उदाहरणे द्यावी. म्हणजे मला स्वतःला पुन्हा तपासून पाहता येईल.

माझा देश, माझी भाषा इतरांच्या देशापेक्षा, भाषेपेक्षा अतिविशेष आहे असे मला वाटत नाही. यात मला वाटते संतपदाला पोहोचण्यासारखे काही नाही. संतपद इतके सोपे असते तर ... :-)