वैद्यांच्या कोणत्याही मुद्द्याशी मी सहमत नाही.

ते शंकर-जयकिशन ह्या जोडगोळीने. काहीही आवश्यकता नसताना, १०० जणांचा ऑर्केस्ट्रा ह्यांनीच भारतात आणला. त्यांची गाणी जरी "रागां"वर आधारीत वगैरे असलीत तरी संगीत भारतीय अजिबात नव्हते.

असे अजिबात नाही. 'बसंत-बहार' मधले मन्ना डे आणि पं. भीमसेन जोशी यांचे 'केतकी गुलाब जूही' ऐका.

त्यांनीच वर आणलेला मुकेश, हा नाकातूनच गायचा.

मुकेशला शंकर जयकिशनांनी वर आणले नाही. मुकेशला ब्रेक दिला तो अनिल विश्वास यांनी. उलट मुकेशची शं. ज. बरोबरची गाणी गाजली तेंव्हा तो सैगलच्या छापातून बाहेर पडून स्वतंत्र शैलीने गाऊ लागला होता.

आर. डी. ने रॉक लोकप्रिय केले हे खरे, पण आर. डी. कधीच टाईपकास्ट झाला नाही. ( रैना बीती जाय..-अमर प्रेम)

कारण, जे आपले स्वतःचे संगीत आहे, ते आपल्याला कळतच नाही किंवा कंटाळवाणे तरी वाटते.

मयूरेशजी, हे अक्षम्य वाक्य आहे. आपले (भारतीय) संगीत फारफारतर तुम्हाला कळत नाही किंवा कंटाळवाणे वाटते, असे म्हणा!

जुनं संगीत ऐकणारी पिठी संपली की जुने संगीतही संपेल

तुम्हाला पिढी म्हणायचं आहे, असं गृहीत धरून सांगतो की (आमच्या) सुदैवानं असं काही नाही आहे. 'जाये तो जाये कहाँ..' हे गाणं माझे वडील, मी आणि माझा मुलगा असे तीघेही गुणगुणतो.

बाकी बऱ्याच मुद्द्यांचा तात्यांनी समाचार घेतलेलाच आहे. विनाकरण वितंडवाद वाढवण्यापेक्षा एक काम करू. अजून दोन वर्षांनी हीच चर्चा पुन्हा सुरु करु.

पाहू धोंडेपाटलांना आणि तुम्हाला हिमेश कोण ते आठवते का!

सन्जोप राव