सत्तरीच्या दशकात शंकर जयकिशन अगदी सामान्य बनले होते. त्यात शंकरने शारदा नामक अत्यंत बेसूर आवाजाच्या बाईला पुढे आणायचेच असा चंग बांधला होता. त्यामुळे आंणि प्रतिभा आटल्याने ह्या जोडीचे संगीत अगदीच सुमार बनले. शंकरने आपले वजन वापरुन अनेक फिल्मफेयर बक्षिसे लाटली असे म्हणतात.
 पण ह्या जोडीने ५०-६० च्या दशकात अत्यंत सुंदर गाणी दिली. आजही ती सुरेल वाटतात. उलट १९८०-९० च्या काळात एक दुजे के लिये, कयामत से कयामत तक, तेजाब अशी त्यावेळेस हिट वाटणारी गाणी कुणी ऐकताना दिसत नाही. मला तरी ती ऐकावीशी वाटत नाहीत.