<<त्यातून, जुने संगीत फार अजरामर होते म्हणून ते टिकले असा दावाही मला मान्य नाही. एकतर त्याकाळी फारशी स्पर्धा नव्हती, आजच्या इतके चॅनलही नव्हते आणि ज्यांनी चित्रपट व्यवसायात जम बसवला होता ते इतरांनाही सहसा वर येऊ देत नसत.>>

मयुरेश,

पहिला मुद्दाः स्पर्धा नव्हती हे चुकीचे आहे. तू स्वतःच सांगीतल्याप्रमाणे मदन मोहन वा सी. रामचंद्र यांना ध्वनिमुद्रणासाठी स्टुडिओ मिळून दिले जात नव्हते. लता ला देखिल हुसकावण्याचा प्रयत्न झाला होता. पण हे सर्व कलावंत टिकले व लोकप्रिय झाले ते त्यांच्या असामान्य गुणवत्तेवर.

आज बरेच चॅनेल आहेत, असंख्य नवे गायक, संगीतकार आहेत पण तरीही मदन मोहन, तलत मेहमूद यांच्या गाण्यांचे कार्यक्रम ओसंडून वाहतात. मी स्वतः मदन मोहनच्या गीतांचा कार्यक्रम ठाण्यात होत नाही म्हणून उठून पार्ल्यापर्यंत जातो. हे एकच उदाहरण कशाला? वर्तमानपत्र उघडून पाहा, अनेक वाद्यवृंद व गायक हे केवळ जुन्या गाण्यांचेच कार्यक्रम करीत आहेत आणि त्यामुळेच ते प्रसिद्धी पावले आहेत. या कार्यक्रमात लता वा तलत नसतात, तर त्यांच्याशी साधर्म्य असलेले तरीही मर्यादा असलेले नवे गायक त्यांची गाणी गाणार आहेत हे माहित असूनही लोक का जातात? तर आज अनेक दशकानंतरही असंख्य लोकांच्या कानात त्या गायक/ संगीतकारांचे सूर रेंगाळत आहेत म्हणून. न पेक्षा आज चॉईस च्या जमान्यात ते कधीच फेकले गेले असते पण ते अढळ आहेत.

फरक इतकाच, की मदन मोहन च्या कार्यक्रमाला आलेले लोक अतिशय संयत असा शालिन प्रतिसाद देतात, कमरेचे सोडून नाचत नाहीत आणि हा कार्यक्रम सादर करणारे कलावंतही सरळ एका जागी बसून साध्या कपड्यात कार्यक्रम सादर करतात.