मा. मयुरेश...

ते सामान्य माणसाला समजायला कठीण आणि बरेचदा "कंटाळवाणे" असच असते.

आपले म्हणने जरा खटकतेय. पुण्यासारख्या शहरात  "सवाई गंधर्व संगीत महोत्सव"  कित्येक वर्षे चालतोय, ते काय उगाच का? 

"कंटाळवाणे" हे तर फ़ारच झाले.  अहो, जे संगीत ऐकल्यावर, माणुस डोलु लागतो , मंत्रमुग्ध होतो, आनंदी होतो ते कंटाळवाणे कसे?

जुनं संगीत ऐकणारी पिढी संपली की जुने संगीतही संपेल.

हे आपणास कुणी सांगितले?

आजही बहुतेक शाळा/महाविद्यालयात स्नेह संमेलना निमित्त जी गाणी वाजवली जातात/ गायली जातात/ ज्यांच्यावर नृत्य केले जाते, त्यात जास्तीत जास्त गाणी जुनीच असतात. आणि मला वाटते की शाळा/महाविद्यालयात  तरूण मुलेच असतात. नाही का?

शिवाय माझ्या पाहणीत तर असेच आले आहे की, बरीच मुले, ठेका चांगला वाटतोय म्हणुन १-२ वेळ नवीन गाणी ऐकतात नी डोके उठले म्हणत!! ः) पुन्हा जुन्या गाण्यांकडेच वळतात.  हा प्रत्यक्ष अनुभव आहे.

गाण्याच्या भेंड्या मध्ये बऱ्याचदा आपण बघितले असेलच की सगळी जुनीच गाणी गायली जातात.

टी.व्ही वर जे गाण्याचे कार्यक्रम होतात त्यातही बरेच गायक जुनीच गाणी गातात.

तेव्हा, हे सगळे ते का करतात? कारण ते खुपच छान चांगले आहे , आवडते म्हणुनच ना!

मला नवीन गाणी वाईटच आहेत असे मुळीच म्हणायचे नाही. पण त्यांची संख्या फ़ारच कमी.

जे चांगले आहे ते नकळत खूप खोलवर मुळं धरते, आणि त्याचा अंत सहजासहजी होत नाही, अगदी पिढ्या न पिढ्या गेल्या तरी.

आजच्या पिढीतही, आवडते गायक/गायिका कोण? विचारले तर अगदी सहज 'लता, आशा, किशोर, रफ़ी' आदींचीच नावे अग्रक्रमाने येतात.

हे आपणास मान्य नसले तरी , सत्य आहेच!! हवे तर सर्व्हे करून बघा!

अजुन एक सांगतो, माझ्या पूर्वीच्या कंपनी मध्ये आम्ही खास गाण्यांचा एक डेडीकेटेड सर्व्हर केला होता, ३० गी बी पेक्षा जास्ती गाणी त्यावर होती (सगळे एम पी ३) . ८०% गाणी ही जुनी !!!  

आय टी क्षेत्रातील साधारण वय बघता २२ - ३५ च्या मधील लोक जास्ती असतात. हे आपणास नक्कीच माहीत असेल. म्हणजे तथाकथीत तरूण वय. तरीदेखील या लोकांना जुनी गाणी फ़ार आवडतात.

शिवाय, पिढ्या? मला सांगा, लता दीदी साधारण किती पिढ्याना आपला सुरेल आवाज देत आहेत?

त्यांचेच 'आनंदघन' या नावाने दिलेले जुने संगीत, आपणास नक्कीच माहित असेल.  'आनंदघन'  नावाची मराठी गाण्याची कॅसेट मिळते बाजारात.

आजही अजरामर आहे!

तेव्हा जुने संगीत संपेल या भ्रमात आपण राहु नये.

जुने संगीत फार अजरामर होते म्हणून ते टिकले असा दावाही मला मान्य नाही. एकतर त्याकाळी फारशी स्पर्धा नव्हती,

फ़ारशी स्पर्धा - म्हणजे काय म्हणायचे ?   प्रत्येक काळात स्पर्धा ही त्या काळाला अनुसरूनच असते. यात जास्ती कमी काही नसते. आजच्या पिढीला आपले जीवन फ़ार गतीमान वाटले म्हणजे जुन्या पिढीचे गतिमान नव्हतेच असे का?  

त्या लोकांनाही तेवढाच संघर्ष करावा लागत होता. तेव्हढीच स्पर्धा होती.

आपणच म्हटले ना ---आजच्या इतके चॅनलही नव्हते

म्हणजे काय? जेवढे स्पर्धक वाढले तेवढी चॅनेल्सही वाढलेत ना? मग स्पर्धा कमी किंवा जास्ती कशी काय? मग आपल्याच शब्दात 'री' ओढायची तर मी म्हणेन की आता स्पर्धा कमीच आहे. येवढे चॅनेल्स आलेत कोणत्या ना कोणत्या चॅनेलवर नक्कीच संधी मिळते.

जुन्याकाळी तसे नव्हते. एकच क्षेत्र उपलब्ध होते.

आता, अनेक चॅनेल्स, त्यावरील सिरिअल्स मध्येही गाणी असतात, रोड शोज चालुच असतात, 'हे' आयडॉल, 'ते' आयडॉल . . चालुच असते

मग संधी कोणाला जास्ती  मिळतेय, आत्ताच्या लोकांना की पूर्वीच्या.... म्हणजे स्पर्धा आत्ताचे लोक अनुभवताहेत की पूर्वीचे??

तुमचेच शब्द हे सिध्द करतात की , आजच्या लोकांना संधी जास्ती उपलब्ध आहेत, पूर्वीच्या नाही. 

दुसरे असे की, आजकाल कोणत्याही गोष्टींची 'चर्चा' फ़ार होतेय .... , त्याकाळी तसे नव्हते. काम जास्ती नी चर्चा कमी, असे असायचे. त्यामूळे त्या लोकांनी काय सोसले, काय स्पर्धा अनुभवली हे लोकांना कितपत माहित असणार.

आजकाल, अजुन पिक्चर स्विकारले नाही तर १० -१२ वेळा मुलाखती... मग काय, आम्ही खुप स्पर्धा अनुभवतोय..हीच टेप वाजवायची...

झाले स्पर्धात्मक युग... काय बरोबर ना?

त्यांमुळे एकाच प्रकारच्या संगीताची छाप बरेच काळ कायम राहिली, कारण, "ऑप्शन्स" फारसे नव्हते.

सध्या 'ऑपशन्स' जास्ती असले तरी जुनी गाणी का चालतात? याचे वर स्पष्टीकरण केले आहेच.

आणि नविन जमान्याचे "रिमिक्स" ... हे काय करतात, जुन्याच गाण्यांच्या जिवावर जगत आहेत ना?

मग जुने संपेल कसे ??

त्यामानाने आज नवीन गुणांना भरपूर वाव आहे. त्यामुळेच दररोज नवीन गायक जन्माला येतात, एक जण जम धरू लागायच्या आत, दुसरा निर्माण होतो

बरोबर, रोज नवीन गायक येतो... पण आजही लता, आशा त्याच अढळ स्थानावर का? याचे वेगळे स्पष्टीकरण द्यायची गरज वाटत नाही.

कुमार सानु, अभिजीत, हे गायक किशोर, रफ़ी चीच गाणी पुन्हा पुन्हा म्हणून आपल्या कॅसेट्स काढतात ना? 

मग जुने कसे संपेल?

नवीन कोणीच संगीत विश्वावर अधिराज्य वगैरे गाजवणार नाही कारण लोकांकडे भरपूर "चॉइस" असेल.

हम्म, अहो, असे कसे, येवढ्या लोकांत, रहमान कसा टिकला?

असे नसते हो, जे चांगले आहे तेच स्विकारले जाणार, ते नेहमीच टिकणार.  उगाच आपला, चॉईस आहे म्हणुन काहीही घ्यायला लोक काय अगदीच 'हे' आहेत होय... ;-)

अवास्तव प्रसिध्दी - सध्या प्रसार माध्यमे येवढी झालीत, की ते नुसता या गोष्टींचा एकसारखा मारा करत असतात. दिवसातुन हज्जार वेळा तोच तो कर्यक्रम दाखवल्यावर काय होणार? अहो नकळत असली गाणी जिभेवर घोळु लागतात.  

त्याला प्रसिध्दी म्हणायचे काय?

असो,

--सचिन