सर्वसाक्षीसाहेब, खरंतर आरक्षणाला माझाही विरोध आहे, पण सरकार असं बेजबाबदारपणे, अविचारी पद्धतीने वागत असलं म्हणून आपणही तसं वागावं हे योग्य नव्हे. आपले हे लिखाण अपमानास्पद नि चीड आणणारे आहे. वास्तविक मी हा एक विनोद समजत होतो, पण आपला

इतका गंभीर विषय इथे चर्चिला जातोय आणि तुम्हाला विनोद सुचतोय? अरेरे. आधीच खेळखंडोबा झालाय तो पुरे आहे आणखी विरंगुळा या विषयावर नको.

हा प्रतिसाद वाचल्यावर आपण काय म्हणू इच्छिता आहात हे मला कळले नि हा प्रतिसाद लिहिण्याचा निर्णय घेतला.

वरील लिखाण वाचून, हे सगळं आरक्षणाचं कटकारस्थान मागासवर्गियांनी इतर उच्चवर्णीयांबाबत मनात द्वेषभावना ठेवून त्यांना ठेचण्यासाठी केलं आहे असा आपला समज झालेला दिसतो. आरक्षण हे सरकारने केले आहे, मागासवर्गीय लोकांनी नाही, त्यांनी तर ते मागितले देखील नव्हते. उलट त्यापैकी कित्येकांचा त्याला विरोधच आहे (माझे कित्येक मागासवर्गीय मित्र याला साक्ष आहेत.)हे आपल्याला माहित नाही काय? तरीही आपण असे मागासवर्गीयांची टर उडवणारे लिखाण कसे करू शकता?

जेव्हा आरक्षित फलंदाज फलंदाजी करेल तेंव्हा चौकार/ षट्काराची सीमारेषा आत घेतली जावी.
आरक्षित नेमबाज जेव्हा नेम बंदूक सरसावेल तेंव्हा लक्ष्याचा आकार वाढवला जावा.

असे का? यावरून मागासवर्गीय सामान्य दर्जाचे आहेत असे आपण सुचवत आहात काय?

आता प्रभाकर पेठकर यांची काही विधाने.

 ब्राह्मणांच्या काही टक्के मुलीही (लग्नासाठी) मागास वर्गासाठी आरक्षित असाव्यात.

हे वाक्य तर सरसकट चीड आणणारे आहे.एका ब्राह्मण लेखकाने (कथितरित्या) लिहिलेले वाक्य आपण सगळ्या मागासवर्गीय लोकांवर कसे थोपू शकता? असे म्हणण्यास मागासवर्गीय तयार होतील इतक्या खालच्या पातळीवर ते गेले आहेत काय?

मागासवर्गीयांना पासेस देऊन त्यांच्या प्रत्येक खरेदीवर ३०% किमान सवलत द्यावी.
का?मागासवर्गीय भिकारी आहेत काय?

राहण्याच्या जागेचा प्रश्न असेल तर सवर्णांना भारताबाहेर (शक्यतो पाकिस्तानात) हुसकावून मागासवर्गीयांना राहत्या जागा उपलब्ध करून द्याव्यात.
कुठल्या मागासवर्गीयाने आपल्याकडे ही मागणी केली हे आम्हाला कळू शकेल काय?

एकूनच, आपण, उच्चवर्णीयांचे प्रतिनिधित्व आपल्याकडे आहे नि प्रत्येक मागासवर्गीय हा या देशाचा शत्रू, उच्चवर्णीयविरोधी, नि आरक्षण मागणारा आहे असे मानून सरसकट विधाने कशी करू शकता?

आपला आरक्षणाला विरोध आहे ना? तो जरूर व्यक्त करा, पण त्यासाठी मागासवर्गीय लोकांवर का घसरता? त्यांचा अपमान का करता? यात त्यांचा काय दोष? दोष असलाच तर तो संधीसाधू नि जनतेला भुलवणाऱ्या पुढाऱ्यांचा आहे.

असो, मनात आले ते लिहिले गेले. पण अनेक देश फिरलेल्या आपल्याबद्दल नि बहुश्रुत पेठकरसाहेबांबद्दल असे लिहावे लागेल असे कधी वाटले नव्हते.

(उद्विग्न) एक वात्रट