मनोगतींनो,
इथे उपहास, अपमान वगरे हेतू निश्चितच नाही.
मग या क्षेत्रात आरक्षण व सवलती का असू नयेत यावर आरोप-प्रत्यारोप न करता निकोप चर्चा का होउ नये?
सरकारची इथे आरक्षण लावायची ताकद नाही असे मला वाटते. खेळ आणि चित्रपटांविषयी जनतेचे वेड लक्षात घेता तिथे कदाचित आरक्षणाला जबरदस्त विरोध होईल व तो अर्थव्यवस्थेवर नियंत्रण असणाऱ्यांचा असेल व त्यामुळेच हे धोरण सरकार राबवू इच्छीत नाही असा माझा रोख आहे.
अन्यथा फ़क्त इथेच आरक्षण न देण्याचे कारण काय? जे उपेक्षित होते ते याही क्षेत्रात उपेक्षित होते. भावना त्यानाही आहेत. चमकायची स्वप्ने त्यानाही आहेत. की इथे गुणवत्तेशिवाय पर्यायच नाही हा विचार आहे?
उगाच प्रक्षोभक वक्तव्ये करण्यापेक्षा तर्कशुद्ध उत्तर द्या.